पांगरी (गणेश गोडसे) -: महाराष्ट्र शासनाचा पाणी पुरवठा व स्वछता विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या बार्शी तालुकास्तरीय स्वछतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा 2014-15 यामध्ये  पांगरी ता.बार्शी येथील कु.वैष्णवी विष्णु जानराव हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. रोख पाच हजार रुपयांचा धनादेश व शासनाचे प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
      वैराग येथील महाविद्यालयात पार पडलेल्या स्वछतामित्र स्पर्धेत सहभागी 35 स्पर्धकामधून कु.जानराव हिची निवड करण्यात आली.कु.जानराव ही सध्या पांगरी येथील सर्वोदय विध्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यात अकरावीत शास्त्र शाखेत शिक्षण घेत आहे.तालुकास्तरीय  यश मिळवल्याबद्दल तिचे बार्शीचे गत विकास अधिकारी प्रशांतसिह मरोड यांच्यासह विविध स्तरामधून अभिनंदन होत आहे.

 
Top