बार्शी - पाण्यात बुडून चार शाळकरी मुलींचा मृत्यू झाला, या घटनेस लघुपाटबंधारे खात्याचे अभियंत्ये जबाबदार असून त्यांच्या हलगर्जीपणामुळेच चौघींचा मृत्यू झाला असल्याने त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणार असल्याचे भा.ज.पा.नेते राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. मिरगणे यांच्या वतीने पत्रकारांसमक्ष मृत मुलींच्या कुटुंबीयांना पंचवीस हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. यचवेळी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय जाधव, बाळासाहेब पाटील महागांवकर, शहराध्यक्ष दत्तात्रय जाधवर, प्रितम परदेशी, अण्णा सुरवसे, सुशांत गायकवाड, पंडित मिरगणे, भागवत पायघन, राजेश पवार आदी उपस्थित होते
 
Top