कळंब (भिकाजी जाधव) :- स्वराज अभियानचे योगेंद्र यादव यांची दुष्काळ संवेदना यात्रा भारतातील सात राज्यात निघणार आहे, दुष्काळग्रस्तांच्या संवेदना जाणून घेण्यासाठी दि.०२ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१५ या कालावधीत ही यात्रा निघणार आहे. दि.०२ रोजी कर्नाटक राज्यापासून ही यात्रा निघाली असून तेलंगणा राज्यानंतर आपल्या मराठवाड्यात येणार आहेत, दि.६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ग्रामिण भागात जाऊन शेतकरी, मजूर यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. त्यानंतर
ते मध्यप्रदेश, बुंदेलखंड, उत्तरप्रदेश, पश्चिम हरियाऩा या राज्यांमधून ही यात्रा जाऩार असून १५ ऑक्टोबर २०१५ रोजी जनसुनवाई कार्यक्रमाने या यात्रेचा समारोप होणार आहे.