उस्मानाबाद - निवडूक आयोगाने मतदार यादीतील नावात दुरूस्ती व आक्षेप नोंदविण्यासाठी दि.8 ऑक्टोबर ते 7 नोंहेबर हा कालावधी आयोगाने निश्चिीत केला आहे.त्यानुसार आता ज्यांचे वय 18 वर्षे आहे.त्यांना मतदारयादीत नाव नोंदविता येणार आहे.येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,आणि नगर पालीका निवडूकीत हीच यादी वापरण्याची शक्यता असून सर्व मतदारांनी आपली नावे यादीत असल्याची खात्री करावी तसेच मतदार यादीत नावेही नोंदवावीत.
          दरम्यान जिल्हृयात सध्या 12 लाख 42 हजार 669 एवढे मतदार आहेत. निवडणक आयोगाने 1 जानेवारी 2016 या दिनांकावर विधनसभ मतदार संघाच्या मतदान याद्यांच्या संक्षिप्त पुर्नरिक्षणाचा कार्यक्रम जाहिर केला असून ज्या मतदारांचे सबंधित मतदान केंद्रावरील प्रमुखाकडे जमा करावेत. जेणे  करून त्याना ओळख पत्र देता येईल.त्याच बरोबर मतदार यादीत एकापेकक्षा जास्त ठिकाणी नावे नोंदणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ज्या  मतदारांनी यापुर्वी एकापेक्षा ठिकाणी नावे नोंदविले असतील त्यांनी एका ठिकाणवरून नाव वगळण्याठी नमुना सात मध्ये अर्ज सादर करावेत .या कालावधीत रविवारच्या दिवशी दि.11 ऑक्टोंबर आणि दि. 18 ऑक्टोंबर या दिवशी विशेष मोहिमेसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी श्री. प्रभोदय मुळे यानी दिली आहे. या दिवशी जिल्हृयातील सर्व मतदार केंद्रावर बीएलओ हजर राहून अर्ज स्विकारणार असून मतदारांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी डाँ.प्रशांत नारनवरे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.***


 
Top