पांगरी (गणेश गोडसे) -: फटाक्यांचा अतिरेकी वापर समाज,पर्यावरण व मानव प्राणी यांच्यासाठी घातक असून पालकांनी फटाक्यावर होणारा अनावश्यक खर्च टाळून पाल्यांना बौद्धीक पुस्तके घेऊन द्यावीत असे आवाहन सचिन पाटील यांनी केले.ते येरमाळा येथील विद्यानिकेतन प्रशालेत फटाकेमुक्त दिवाळी यासंदर्भात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.पाटील पुढे बोलताना म्हणाले की, फटाक्यांमुळे कोट्यावधी रूपयांची नासाडी होते.तसेच त्याचा निसर्गावरही परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.त्यामुळे विद्यार्थ्यांनीही संकल्प करून एकमेकाच्या बौद्धीक क्षमतेत वाढ व्हावी यासाठी एकमेकांना पुस्तकरूपी अमृत भेट म्हणून द्यावे.
सर्व विद्यार्थ्यांना आम्ही फटाके फोडणार नाही,प्रदूषण करणार नाही,पर्यावरणाचा -हास होईल असे कृत्य करणार नाही अशी प्रतिज्ञा देण्यात आली.प्रशाळेत फटाके मुक्त दिवाळी,प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम गत वर्षीपासून राबवण्यात येत आहे.असा सामाजिक उपक्रम राबवणारी विद्यानिकेतन प्रशाला ही एकमेव शाळा ठरत आहे.
यावेळी प्रशाळेचे मुख्याध्यापक वैभव पंडित,विष्णु पाटील,बाळासाहेब पाखरे,संजय बांगर,अभिजीत जाधवर,उर्मिला जमाले,बालिका सारंग,ऊज्वला पाटील,माधुरी म्हसे,आशा ताटे,शुशमा बारकूल,कोमल बारकूल,कृष्णाली जगदाळे यांच्यासह प्रशाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.