पांगरी (गणेश गोडसे) :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 20 ऑक्टोबर 2015 ते 20 ऑब्टोबर 2016 दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाहीर अमर शेख जन्मशताब्दी समितीने एका प्रशिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ,शाहीर अमर शेख यांच्या जीवनावरील पेंटिंगचे प्रदर्शन,शंभर लोककलावंतांचा सत्कार,व्याख्यान यासह त्यांच्यावरील साहित्य व विचारांवर आधारित परिसंवादाचे मुंबई,पुणे,औरंगाबाद,नाशिक,सोलापूर,बेळगांव आदि शहरात आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रीय एकात्मता,समता,राष्ट्रभक्ती,याच्या जडणघडणीसाठी आयुष्य वेचलेल्या शाहीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जन्मशताब्दी समितीच्या वतीने दूरदर्शी व सर्व स्पर्शी व्यापक समाजहिताच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी माणसांचे भारतीय स्वातंत्र्यातील योगदान,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,शाहीर अमर शेख यांचे साहित्य व विचार,महाराष्ट्र काल,आज,उद्या या विषयांवर राज्यस्तरीय निबंध स्पर्ध्याचे आयोजन करण्यात आले असून स्पर्धेसाठी 10 हजार रुपये प्रथम,7 हजार रुपये द्वितीय,5 हजार रुपये तृतीय,व 1 हजार रुपयांची 3 उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.स्पर्धा सर्व गटासाठी खुली असून सहभागी इछूकांनी आपले निबंध 30 डिसेंबर 15 पर्यन्त शाहीर अमर शेख जन्मशताब्दी समिती द्वारा वाहेद्पाशा शेख यांच्या पत्यावर पाठवावेत असे आवाहन करण्यात आलेले आहे.