उस्मानाबाद :- राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेनेवसुंधराविज्ञानकेंद्र नेरूरपार,कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे दि. ५व ६ डिसेंबर दरम्यान राज्य पातळीवरीलविज्ञान प्रदर्शनाचेआयोजन केले होते. महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या प्रकल्पातून ३० प्रकल्पाची चंडीगड येथे २६ ते ३१ दरम्यानहोणाऱ्याराष्ट्रीयबालविज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
निवड झालेल्या प्रकल्पात उस्मानाबाद जिल्ह्यातीलकलदेव निंबाळा, ता.उमरगा येथील कॉ. नारायणराव आडम प्रबोधन केंद्र सोलापूर संचालितशहीदभगतसिंगहायस्कूलच्या प्रकल्पाची निवड झाली आहे. २०१४मध्ये भोपाळ येथेझालेल्याराष्ट्रीयबालविज्ञान प्रदर्शनासाठीही या शाळेच्या प्रकल्पाची निवड झाली होती.राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे डॉ.सुरेंद्र दिघे यांनी या प्रसंगी ऋषिकेशत्रंबक गायकवाड वपुष्पा क्षीरसागर यांचा सन्मान केला. यावेळी दिघे मँडम वउस्मानाबाद जिल्हा समन्वयक रवींद्र स्वामी उपस्थितहोते.
सुगरणीच्या घरट्यावर होणारा हवामान बदलाचा परिणाम या विषयावरील प्रकल्प ऋषिकेशत्रंबक गायकवाड या ९वीतल्याविद्यार्थ्याने सादर केला होता. या प्रकल्पाच्या अभ्यासासाठी ऋषिकेशत्रंबक गायकवाड हागट प्रमुख तसेच सुधीर देविदास सूर्यवंशी, कल्लेश्वर परमेश्वर सरवदेव ईश्वर व्यंकट सरवदे हे विद्यार्थी सहभागी झाले होते. हायस्कूलच्याविज्ञान शिक्षिका पुष्पा क्षीरसागर यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले होते.
कॉ. नारायणराव आडम प्रबोधन केंद्र सोलापूर संस्थेचेअध्यक्ष कॉ. नरसय्या आडम मास्तर,सचिवएम.एच.शेख, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य बन्सी हावळे व उस्मानाबाद जिल्हा समन्वयक रवींद्र स्वामी यांनी ऋषिकेशत्रंबक गायकवाड व पुष्पा क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आहे.
या प्रकल्पासाठी मुख्याध्यापक प्रमोद तावशीकर, शिक्षक नीलकंठ रेऊरे, इस्तीयाक शेख, रतन सूर्यवंशी, रामचंद्र गिरजाल व शाळेच्या सर्व स्टाफचे सहकार्य लाभले.