उस्मानाबाद :- हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना जिल्हयातील केळी,आंबा,डाळिंब,मोसंबी,व पेरू या पिकासाठी लागू केलेली आहे. या येाजने अंतर्गत सन 2015-16 हंगामात कर्जदार व बिगर र्कदार शेतक-यांना द्राक्ष, डाळिंब, पेरू व केळी या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅंकेत दाखल करण्याचा अंतिम दि.10डिसेंबर 2015 आहे. तर आंबा या पिकासाठी विमा प्रस्ताव बॅकेत दाखल करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2015 आहे.
शेतक-यांनी प्रती हेंक्टरी द्राक्ष पिकासाठी रूपये 8328, केळी पिकासाठी रूपये 6640, डाळिंबासाठी रू. 5844, मोसंबी या पिकासाठी रू. 3450 आणि पेरू या पिकासाठी रू. 1830 तर आंबा या पिकासाठी रू. 5244 इतका विमा बॅकेत भरून पिक संरक्षित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
या योजने अंतर्गत फळपिकांना अवेळी पाऊस,तापमान,आर्द्रता,वेगाचा वारा व गारपिट या हवामान धेाक्यापासून संरक्षण मिळणार आहे.अधिक माहितीसाठी शेतऱ्यांनी महसूल मंडळशी सर्पक साधावा.