उस्मानाबाद :- राज्य शासनाने 23 आक्टोबर रोजीच्या शासनपत्राने दि.31 आक्टोबर पुर्वी रद्द व्यपगत झालेल्या परवान्यांचे नुतनीकरण करण्याकरीता परवानाधारकांना 30 नोव्हेंबर 2015 पर्यत देण्यात आली होती. परवाना नुतनीकरण न केल्यास कायमस्वरूपी परवाना रद्द होणार असल्याचेही परवानाधरकांना सुचित केले होते. परंतु बऱ्याचशा परवानाधारकांनी परवान्याचे नुतनीकरण केलेले नाही. त्यामुळे अशा रद्द व व्यपगत झालेले व मुदतवाढ दिनांकापर्यत नुतनीकरण न केलेले अॅटोरीक्षा परवाने कायमचे रद्द करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.