यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करावा ,तालुक्यातील ३५ गावच्या पाणी प्रश्नाला तत्कालीन निधी उपलब्ध करून द्यावा , उसाला पहिली उचल प्रती टन ३ हजार रुपये, दुधाला प्रती लिटर ३० रुपये , जनावरांना चारा डेपो तत्काळ सुरु करावा अन्यथा प्रती जनावरांना १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यास तत्काळ पाणी सोडण्यात यावे अशा विविध मागण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला.
रस्ता रोको करण्यात आलेल्या बाबत निवेदन उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल,पोलीस निरीक्षक सुधाकर देडे व तहसीलदार विनोद रणावरे यांना निवेदन देण्यात आले.
बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रवक्ते संजय पाटील-घाटणेकर, जिल्हा अध्यक्ष माउली हलनवर, राज्य प्रदेश अध्यक्ष युवा आघाडी दत्ता गण-पाटील,तालुका अध्यक्ष प्रा.संतोष पवार, जिल्हा उपअध्यक्ष सोमनाथ भोसले,राजू घाडगे,माउली जवळेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार,दत्ता मासाळ,माजी सभापती काशिनाथ पाटील,माजी सरपंच दादासो पवार ,डॉ.माणिक पवार,भाऊ जगताप,शहाजी पवार,रितेश रोंगे,अमोल घुले,बालाजी पवार,विकास दुधाळ,इक्बाल मणेरी,जालिंदर माने,बाबू बनसोडे,विजय सोनवणे,सोमांना शिवशरण यांच्यासह ५०० शेतकरी उपस्थित होते.
यावेळी संजय भाऊ घाटणेकर,माउली हलनवर.प्रा.संतोष पवार व दत्ता गणपाटील यांनी शासन शेतकरी विरूधात भूमिका घेत असल्याने शासनाला शेतकऱ्याचा विचार करून विविध मागण्या मान्य करावे लागतीच असे ठणकावून सांगितले.
रस्ता रोकोसाठी मंगळवेढा पोलीस ठाण्याकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी मंगळवेढ्याकडून व विजापूर कडून येणाऱ्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या व मरवडे गावाचा बाजार असल्याने आसपास परिसरातील हि शेतकरी मोठ्या संखेने सहभागी झाले होते. शासना विरूधात घोषणाबाजी करण्यात आली