नळदुर्ग :- कलाकार व पत्रकारांनी संवेदनशिलतेने आपआपल्या क्षेत्रात काम करावे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी अणदूर (ता. तुळजापूर) येथे कलावंत मराठी रंगभूमी दिन विशेषांक प्रकाशनात बोलताना केले.
आधार सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या ''मराठी रंगभूमी दिन'' या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, कलावंत दयानंद काळुंके यांनी संपादित केलेल्या ''कलावंत'' विशेषांक प्रकाशनाच्या वेळी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले की, लोककलाकारांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे. अतिशय चांगल्या प्रथा कलाकारांमार्फत ग्रामीण भागामध्ये परिवर्तनाची बाजू ठरीत आहे. वाईट व अघोरी प्रथा बंद करुन प्रगतीच्या नव्या वाटा शोधावा, असेही ते म्हणाले. दुष्काळी परिस्थितीचे वास्तववादी लिखाण पत्रकारांनी करावे व कलाकारांनी शेतकरी आत्महत्याबाबत समाजामध्ये जाणिव जागृती करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमासाठी श्री कुलस्वामिनी सुतगिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण, माजी पोलीस आयुक्त सुरेश कंदले, बालाजी मोकाशे, ईश्वर क्षिरसागर, संभाजी सुर्यवंशी आदीजण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आर.एस. गायकवाड, माणिक निर्मळे, अजय अणदूरकर, चंद्रकांत हागलगुंडे, चंद्रकांत गुड्ड, सोमनाथ्ज्ञ बनसोडे, कैलास बोंगरगे, कमलाकर घुगे, सुनिल क्षिरसागर, दादा जेटीथोर, सुधाकर पवार, धोंडीबा लंगडे, रमाकांत माने, रमाकांत माने, उमेश गायकवाड, प्रदीप पाटील, जावेद शेख, गुरुनाथ गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोध कांबळे यांनी केले तर आभार दयानंद काळुंके यांनी मानले.