
थंडीसाठी शेकोट्याचा आधार : ग्रामीण भागात थंडीचा आलेख वाढता असल्यामुळे थंडीपासून आपला बचाव करण्यासाठी पहाटे व सायंकाळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.एरव्ही कधी घराबाहेर न पडणारेही वाढत्या थंडीमुळे घराबाहेर पडून शेकोटीचा अंदाज घेत तेथे पोचून चार माणसात बसू लागले आहेत.त्यामुळे थंडीचा सुरू असलेला हंगाम व शेकोट्या ह्या एकप्रकारे माणसांना जवळ आणण्यासाठी व हेवेदावे विसरण्यासाठी एक प्रभावी साधन ठरत आहे. ग्रामीण भागात किरकोळ कारणारून झालेल्या भांडनातून दुरावलेली व वेगवेगळ्या दिशेला झालेली तोंडे शेकोतीमुळे पुन्हा समोरासमोर येऊन त्यांच्यात पुन्हा संभाषण सुरू होऊन त्यांच्यात परत संबंध निर्माण होऊ पहात आहेत.
वाढती थंडी कांही शेतकर्याना फायद्याची तर काहिंना तोट्याची ठरत आहे.बोचर्या थंडीमुळे कांदा पिकाची वाढ चांगली होऊन शेतक-र्यांना लाभदायक होत आहे.कोरडवाहु शेतकर्यांची थंडीमुळे चांदी होत आहे.बिगरपाण्याच्या व बरडी गहू,ज्वारी आदि थंडीवर येणार्या पडलेल्या लाटीमुळे पिके चांगलीच तग धरून असून टवटवी आली आहे. शेतकर्याणी ज्वारी कोळपणीची कामे हाती घेतली आहेत.
द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम : वाढत्या थंडीचा पांगरी भागातील द्राक्ष बागावर विपरीत परिणाम जावू लागला आहे.अगोदरच सलग चार वर्ष दुष्काळाच्या छायेखाली कसे बसे जीवन व्यतीत करत असलेल्या द्राक्ष उत्पादकाला वाढत्या थंडीमुळे आर्थिक तोटा सहन करून बागावर फवारण्या कराव्या लागत आहेत.अलीकडील कांही दिवसात तापमानात मोठी घट होत असल्यामुळे द्राक्ष बागावर भुरी सदृश्य आजाराचे प्रमाण वाढले आहे.
कांही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे व त्याच्यावर उपचार करता करता अगोदरच जीव मेटाकुटीला आलेल्या द्राक्ष उत्पादकांना वाढत्या थंडीमुळे आणखीच संकटात टाकले आहे.इतर पिकांना थंडीचा पुरेपूर फायदा होत असला तरी द्राक्ष उत्पादक मात्र थंडीने हैराण झाले आहे.तसेच अधून मधून आभाळ फिरत असल्यामुळे अस्मानी संकट कोसळते की काय याच चिंतेत द्राक्ष उत्पादक गुरफाटला जात आहे.
गतवर्षीची आठवण : गोठते तापमान,त्याचा वयोवृद्धांणा होत असलेला त्रास,त्यातून उद्भवत असलेले विविध आजार यामुळे यावर्षीचा हिवाळा अनेकांना सहन करण्याच्या पलीकडे जात आहे.सलग पडत असलेल्या दूषकाळामुळे गत वर्षी अत्यल्पशीच थंडी जाणवली होती.त्यामुळे वृद्ध गत वर्षीची आठवण काढून गेलेलेच वर्ष बरे असे म्हणत आहेत.