पांगरी (गणेश गोडसे) :- ग्रामविकास विभागा अंतर्गत महाओंनलाईन कंपनी कडून राज्यातील प्रत्येकग्रामपंचायती मध्ये नेमणूक केलेल्या संगणक परीचालकाचा मोर्चा ग्रामपंचायतस्तरावर पद्निश्चीत करून जिल्हा परिषदेच्या शासन सेवेत घेणे या मुख्यमागणीसह विविध मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर १५ डिसेबर रोजीधडकणार आहे .
याबाबत सविस्तर वृत्त कि मागील ४ वर्षापासून ग्रामविकास विभाग केद्रशासन व राज्य शासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने राज्यात संगणकीकृत ग्रामीणमहाराष्ट्र (संग्राम )हा प्रकल्प चालू आहे या प्रकल्पात महाऑनलाईन कडूनप्रत्येक ग्रामपंचायती साठी १ तर पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर २संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे . सर्व संगणक परिचालकानीचांगले व प्रमाणिक काम केल्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाला ईपंचायत मध्ये देशात सलग ३ वर्ष प्रथम पारितोषिक मिळाले आहे .परंतु यामहाओनलाईन कंपनीने संगणक परिचालकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक केलीत्यामुळे शासनाने सर्व संगणक परिचालकाना ग्रामपंचायत /पंचायत समिती वजिल्हा परिषद स्तरावर पद्निश्चीत करून शासन सेवेत घेऊन किमान १५००० रुमासिक वेत द्यावे या मागणी साठी गेल्या १ वर्षापूर्वी नागपूर येथील हिवाळीअधिवेशन ,मुंबई येथील उपोषण मोर्चा धरणे आंदोलन केले त्या दरम्यान शासनानेवारवार आश्वासने दिली परंतु धोरणात्मक निर्णय घेतला नाही .शासनाने एकीकडेडिजिटल इंडिया व डिजिटल महाराष्ट्र ची घोषणा केली आहे ,नागरिका साठीओंनलाईन सेवा हमी कायदा आणला आहे पण या सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संगणकपरिचालकाना उपाशी ठेवण्याचे काम झाले असून आम्हाला ग्रामविकास विभागाव्यतिरिक्त अन्न व नागरी पुरवठा ,आरोग्य ,पर्यावरण ,रोहयो ,जलसंधारण ,उर्जा ,महसूल ,सामाजिक न्याय ,शालेय शिक्षण विभागा सह इत्तर विभागाचे कामे द्याती कामे आम्ही करू पण येणाऱ्या संग्राम प्रकल्प २ मध्ये राज्यातील सर्वसंगणक परिचालकाना ग्रामपंचायत /पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरपद्निश्चीत करून शासन सेवेत घेऊन किमान १५००० वेतन देण्यात यावे या साठीनागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सुमारे २७ हजार संगणकपरिचालकांचा मोर्चा १५ डिसेंबर रोजी धडकणार असल्याची माहिती संघटनेचेराज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली आहे .
जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत नागपूर सोडणार नाही – सिद्धेश्वर मुंडे
सलग १ वर्षापासून आमचे आंदोलन चालू आहे ,संग्राम प्रकल्प देशात क्र १ वरठेवण्याचे काम कंपनी च्या तुटपुंज्या मानधनावर संगणक परिचालकानी केले आहे .तरीही शासनाने अद्याप आमचा प्रश्न सोडवला नाही .म्हणून जो पर्यंत आमच्यामागण्या मान्य होणार नाहीत तो पर्यंत नागपूर सोडणार नसल्याचा निर्धारअसल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.