नागपूर : विधानसभेवर काढण्यात आलेल्या मातंग समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या लाठीचार्जध्ये 70 मोर्चेकर्ते जखमी झाले आहेत. नागपूरच्या कस्तूरचंद चौकात ही घटना घडली आहे.
नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे विधानसभेवर दररोज मोर्चे धडकत आहेत. विविध मागण्यांसाठी आज मातंग समाजाने मोर्चा काढला. नांदेडहून नागपूरपर्यंत पायी येऊन मातंग समाजाने हा मोर्चा काढला होता. या मोर्चात १५० जण सहभागी होते. मुख्य चौकात जाण्याआधीच हा मोर्चा अडवला, असे कार्यकत्र्यांचे म्हणणे आहे. परंतु कार्यकर्ते बॅरिकेटस् हटवून मध्ये घुसण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यामध्ये ७० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या या लाठीमाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.