उस्मानाबाद :- जिल्ह्यात दि. 24 डिसेंबर 2015 रोजी बकरी ईद हा सण साजरा होणार आहे. तरी वरील उत्सव जिल्ह्यात शांततेत पार पाडवा मिरवणुका दरम्यान वाहतुकीचे नियंत्रण व नियमन करणे आवश्यक आहे व कोणतेही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी. जर तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीवर तात्काळ मात करता यावी, म्हणून पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 प्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरीष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दि. 23 डिसेंबर ते दि. 25 डिसेंबर 2015 रोजीचे मध्यरात्रीपर्यंत नियमनात्मक अधिकार बहाल केले आहेत.
यानुसार हे अधिकारी सडकांवरील किंवा सडकेने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालावे, त्यांनी त्यांची वर्तणुक किंवा वागणुक कशी ठेवावी याविषयी निर्देश देणे, अशा कोणत्याही मिरवणुका कोणत्या मार्गानी जाव्यात किंवा कोणत्या मार्गानी जाऊ नयेत ते मार्ग विहीत करणे, सर्व मिरवणुकींच्या व जमावांच्या प्रसंगी व प्रतिमा पुजनाच्या कोणत्या सर्व कोणत्या सर्व जागांच्या आसपास प्रतिमा पुजनाचे वेळी व कोणत्याही सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असेल अशा सर्व ठिकाणी अडथळा होऊ न देणे, सर्व रस्त्यांवर, नद्यांच्या घाटांवर सार्वजनिक ठिकाणी, स्नानाचे कपडे धुण्याच्या ठिकाणी जागेमध्ये बंदोबस्त व सुव्यवस्था राखणे, कोणत्याही रस्त्यात सडकेजवळ किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविणे आणि शिंगे, कर्कश वाद्य, वाजविणे यावर नियंत्रण करणे अगर त्यावर नियंत्रण ठेवणे, सक्षम अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम 33,34,37 ते 42 45 या कलमान्वये केलेल्या कोणत्याही नियमनात्मक आदेशांचे अधिन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे आदीबाबत निर्देश देऊ शकतील. जो कोणी वरील नियमनात्मक आदेशांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करेल तर तो मुंबई पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे पोलीस अधीक्षक उस्मानाबाद यांनी कळविले आहे.