नळदुर्ग
:- प्रशासनाने शेकडो कुटूंबियांची पक्की घरे उध्दवस्त करुन बेघर करणा-या मुख्याधिका-यांचा
निषेध करुन येत्या पंधरा दिवसात बेघर कुटूंबियांचे कायमस्वरुपी घरे बांधून पुनवर्सन
करावे व मोडीत निघालेल्या व्यावसायिकांचे तात्काळ व्यवसाय सुरु करण्याची मागणी
करुन
याप्रकरणी अतिक्रमण हटाव मोहिमेची उच्चस्तरीय चौकशी करुन मुख्याधिका-याना तात्काळ निलंबित
करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ
यांनी नळदुर्ग येथे केले.
रिपाइंच्यावतीने रोजगार व निवारा हक्क महामोर्चाचे
आयोजन नळदुर्ग येथे सोमवार दि. 18 जानेवारी रोजी करण्यात आले होते. हा मोर्चा शांततेत
पार पडला. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेवर
हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वधर्मीय बेघर झालेले कुटूंब व व्यावसायिक मोठया
संख्येनी सहभागी झाले होते. प्रारंभी अक्कलकोट रोड येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत
सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन मोर्चास प्रारंभ झाला. हा मोर्चा अक्कलकोट
रोड, बसस्थानक, शहरातील मुख्य रस्त्यावरुन हुतात्मा चौक, कुरेशी गल्ली, किल्ला गेट,
क्रांती चौक, बाजारपेठ, चावडी चौक, भवानी चौक मार्गे न.प. वर मोर्चा धडकला. यावेळी
आपल्या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार माणिक पवार यांना देण्यात आले.
यावेळी बोलताना राजाभाऊ ओव्हाळ पुढे म्हणाले
की, नळदुर्ग येथे बंजारा, दलित, अल्पसंख्यांक समाजाचे शेकडो घरे नगरपालिकेने बेकायदेशीररित्या
उध्दवस्त करुन त्यांना बेघर केले. विकासाच्या नावाखाली गोरगरीब व्यावसायिकांची दुकाने
भुईसपाट केली. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असे सांगून रमाई आवास योजना, इंदिरा
आवास योजना यासह इतर योजना राबविण्याऐवजी नगरपालिकेने घरे पाडून बेघर केले. तात्काळ
बेघरांचे व व्यावसायिकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करावे, अन्यथा जिल्हाधिका-यांना घेरावा
घालून रिपाइंच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष आनंद पांडागळे,
जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष
एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, युवाआघाडीचे तालुकाध्यक्ष अरुण
लोखंडे, ताज ग्रुपचे अध्यक्ष मन्सूर शेख, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर,
राजा शिंदे आदींनी न.प. च्या गलथान कारभाराचा निषेध करुन शासनाने चौकशी करुन दोषींवर
कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख विदयानंद बनसोडे,
तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, नळदुर्ग शहरउपाध्यक्ष दत्ता बनसोडे, शिवसेनेचे शहरप्रमुख
संतोष पुदाले, विश्वास रणे, बालेश्वर नाईक, दिपक सुरवसे, प्रकाश बनसोडे, महादेव कांबळे,
बंजारा आघाडीचे आनंद चव्हाण, जिजाबाई नाईक, सिताबाई राठोड, सुनिता बनसोडे, जिजाबाई
दुपारगुडे, अशोक बंजारे, राजाराम नाईक, राम नाईक, रहिम शेख, लक्ष्मण नाईक, मुकुल चव्हाण,
मैनोदृीन इनामदार, संजय राठोड यांच्यासह 400 पेक्षा अधिक महिला, पुरुष नागरीक उपस्थित
होते. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सपोनि फुलचंद मेंगडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त
ठेवला होता.