नळदुर्ग -: येथील बौध्दनगरच्या सर्व्हे नं. 29 मध्ये न.प. प्रशासनाने रस्त्यावरील
अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली दलित, बंजारा (लमाण) व अल्पसंख्यांकाचे घरे उध्दवस्त
केल्याच्या घटनेनंतर शनिवार दि. 23 जानेवारी रोजी राष्ट्रसेवा दलाचे तथा ज्येष्ठ समाजवादी
विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यानी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेताना बेघर झालेल्या
कुटूंबियांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे सांगून याप्रकरणी आपण
अन्याय झालेल्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्याचे सांगितले.
नळदुर्ग येथील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची
मोहीम दि. 28 ते 30 डिसेंबर रोजी नगरपालिकेने हाती घेतली होती. मात्र अक्कलकोट रोड
लगत बौध्दनगरच्या सर्व्हे नं. 29 मध्ये गेल्या पन्नास वर्षापासून राहणा-या बंजारा
(लमाण), दलित व अल्पसंख्यांक समाजाच्या जवळपास शंभर घरे जेसीबीने पाडून अनेकांना बेघर
केले. वास्तविक पाहता येथील घरे रस्त्यावर आलेली नव्हती. प्रशासनाने केलेल्या अन्यायाची
माहिती घेण्यासाठी शनिवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ज्येष्ठ समाजवादी विचारवंत
पन्नालाल भाऊ सुराणा यांनी भेट दिली. नगरपालिकेने उध्दवस्त केलेल्या घराच्या ठिकाणी
भेट देवून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी बेघर कुटूंबियांनी त्यांना प्रशासनाने
केलेल्या अन्याय, अत्याचाराची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी नळदुर्ग शहराबाहेर
उघडया डोंगर माळरानावर असलेल्या बेघर कुटूंबियांना प्रत्यक्षा जावून आवर्जून भेट घेतली.
सुराणा यांना बेघर कुटूंबियापैकी श्रीमती सुनिता बनसोडे, जिजाबाई नाईक, वालाबाई जाधव,
पमाबाई शिंदे, पेमाबाई जाधव, रेवूबाई नाईक, लालूबाई जाधव, राजाराम नाईक, अशोक बंजारे,
फुलचंद जाधव, बाबुराव राठोड, बाशीद कुरेशी, संजय परसराम राठोड, संजय शंकर राठोड यांनी
आपली व्यथा सांगितले.
यावेळी सामाजिक परिवर्तन संस्थेचे सचिव मारुती
बनसोडे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, पत्रकार शिवाजी नाईक, नगरसेवक संजय
बताले यांनी सुराणा यांना न.प. प्रशासनाने केलेल्या अन्यायाची माहिती दिली. विस्थापित
झालेल्या कुटूंबांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करावे या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी,
औरंगाबादे विभागीय आयुक्त यांच्यासह संबंधिताची भेट घेणार असल्याचे सुराणा यांनी सांगितले.
यावेळी आपलं घरचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार,
आधार सामाजिक संस्थेचे दयानंद काळुंके, सामाजिक कार्यकर्ते मारुती खारवे, रिपाइंचे
जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, बंजारा आघाडीचे जिल्हाध्यक्ष आनंद चव्हाण, शहराध्यक्ष
बाबासाहेब बनसोडे, दत्ता बनसोडे, दादासाहेब बनसोडे, विकास नाईक, सुनिल जाधव, विकास
बनसोडे, अजीम अ.सत्तार कुरेशी, सय्यद जमाल यांच्यासह बेघर कुटूंबियातील महिला, पुरुष
नागरीक उपस्थित होते.
प्रशासनाने आमच्यावर मोठा अन्याय केला असून तुळजापूर
विधानसभा मतदार संघाचे आमदार मधुकरराव चव्हाण, प्रशासनाच्या अधिका-यांनी अदयापपर्यंत
साधी विचारपूसही केले नसल्याने बेघर कुटूंबियांतून संताप व्यक्त केला जात आहे.