नळदुर्ग
- येथील
नगरपालिका प्रशासनाने डिसेंबर मध्ये शहरातील वडिलोपर्जित कब्जे वहिवटनूसार राहणा-या
नागरिकांची चुकीच्या पध्दतीने राहती घरे उध्दवस्त करुन अनेकांना बेघर केले. या कुटूंबियांचे
पूर्वी राहत असलेल्या जागेवरच शासनाने त्वरित पुनर्वसन करावे, केंद्रिय उच्चस्तरीय
चौकशी करून दोषींना शिक्षा व्हावी, या प्रमुख
मागणीसाठी परिसरातील 25 विविध सामाजिक, शैक्षणिक, सेवाभावी संस्थेच्यावतीने नळदुर्ग
येथे मंगळवार दि. 1 मार्च रोजी सकाळी 10 वाजता जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा
यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्वसन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन महिन्यापूर्वी नळदुर्ग
येथील रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याचे आदेश शासनाचे असताना गेल्या पन्नास
वर्षापूर्वीपासून वास्तव्य करुन राहत असलेल्या बंजारा (लमाण) व दलित, अल्पसंख्यांक
समाजाची घरे राक्षसी वृत्तीने पाडून त्यांना न.प. प्रशासनाने हुसकावून लावून बेघर केले.
शहरातील 63 आरक्षित जागेपैकी केवळ दोन ते तीनच जागेवरील अतिक्रमण काढले आहे. या अन्यायग्रस्त
बेघर कुटूंबियांना पुर्वी राहत असलेल्या जागेवरच त्यांच्या हक्काचे घर मिळावे, विस्थापित
झालेल्या बेघर कुटूंबियांना रोजगाराची सुविधा शासनाने उपलब्ध करुन दयावी, नळदुर्ग शहरातील
63 आरक्षित जागेपैकी केवळ दोन ते तीन आरक्षित जागेवरील राहती घरे हेतू परस्पर काढून
दुजाभाव करणा-या मुख्याधिका-याची चौकशी करुन निलंबित करावे, याकरीता दि. 1 मार्च
2016 रोजी नळदुर्ग येथे निवारा पुनर्वसन कृती समितीच्यावतीने “पुनर्वसन परिषद” चे आयोजन करण्यात आले आहे.
या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा तर उदघाटक
म्हणून भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग भाई राठोड, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्वराज अभियानचे सुभाष
लोमटे, मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबादचे जेष्ठ विधिज्ञ ॲड. विष्णू ढोबळे, जेष्ठ
साहित्यिक रमेश पवार, पत्रकार सुनिल ढेपे, फुशाबा सामाजिक विकास संस्था (उस्मानाबाद)
अध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, तुळजापूर पं.स. सभापती प्रकाश चव्हाण, गोर सेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष
राजाभाऊ पवार, बंजारा क्रांती दलाचे युवा प्रदेश सरचिटणीस पिंटू राठोड यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन निवारा
पुनर्वसन कृती समिती नळदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.