नळदुर्ग :- महाराष्ट्रात पाण्याचा तुटवडा असल्याने थोडया पाण्यात भरपूर शेती उत्पादन
मिळवावे, यासाठी ठिबक सिंचन आणि लांबवरची पाईपलाईन यांचे जाळे उभे करण्याचा फार मोठा
प्रयत्न उदयोग भवरलाल जैन यांनी सुरु केला. आंध्रप्रदेशामध्ये टोमॉटो व आंबा यावरचे
प्रक्रिया उदयेाग सुरु करुन अनेक लोकांना रोजगार मिळवून दिला. जळगावच्या जैन हिल्स
व चार हजार आंब्यांची झाडे लावून आंब्यांच्या मशागतीचे शेतक-यांना चांगले प्रशिक्षण
देण्याची सोय केली. मराठी मातेशी एकरुप झालेल्या या थोर उदयोगपतीला सोशालिस्ट पार्टीचे
पन्नालाल भाऊ सुराणा यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.