तुळजापूर :- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढण्यात आली. विविध संतांच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषा करून शाळेतील २५०बालवारकरी यात सहभागी झाले होते. श्री दादासाहेब कदम , उपसरपंच धनाजी डांगे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी सरपंच श्री महादेव जाधव ,तानाजी पाटील, चैतन्य गिरी, देविदास गायकवाड ,विठ्ठल नरवडे, तुकाराम कदम ,हणमंत कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते .यावेळी श्री धनाची डांगे यांनी मुलांवर चांगले संस्कार करणारी व वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारी दिंडी याचे आयोजन शाळेने चांगल्या प्रकारे केले असून भौतिक प्रगतीबरोबरच सुसंस्कारित पिढी बनणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी शाळेचे कौतुक केले.
मुलांच्या मदतीने तयार केलेल्या पालखीत संत प्रतिमा ,ज्ञानेश्वरी ग्रंथ याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्यात कामी महत्त्वपूर्ण असलेल्या वृक्षांचे महत्त्व ,वृक्ष लागवड व त्यांचे जतन करणे ही चळवळ बनावी यासाठी पालखीत वृक्षांचे रोपटे ठेवून त्याचेही पूजन करण्यात आले ." वृक्ष म्हणू की ऋषी म्हणून ते तर जनहित दक्ष " या वचनाची सत्यता पटवून देणे व ते जोपासने याबाबत यातून आवाहन करण्यात आले. या बाल दिंडीत विठ्ठल, रुक्मिणी ,महादेव ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, नारद मुनी ,संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या लक्षवेधी व आकर्षक वेशभूषा मुलांनी साकारल्या होत्या .तसेच इतर सर्वांनी वारकरी वेशात दिंडीत सहभाग घेतला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत दिंडी गावातील प्रदक्षिणा मार्गावरून निघाली. यावेळी गावातील भाविकांनी आपापल्या घरासमोर दिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली व दिंडीचे पूजन करून दर्शनही घेतले. या सोहळ्यात गावातील भजनी मंडळ ,भाविक महिला व नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिंडीत रंगत आणली तर झेंडेकरी टाळकरी यांचे "गोल रिंगण" हे या सोहळ्याचे आकर्षणाचे केंद्र ठरले .
संस्कृती व परंपरा जपत सध्याच्या काळात समाजासाठी उपयुक्त व गरजेचे संदेशही उपक्रमाच्या माध्यमातून दिले गेले. वृक्षसंपदा वाढवा असे सांगणारा "वृक्षराजा"ही साकारला होता तर पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचे दुरुपयोग, प्लास्टिक बंदीची उपयुक्तता सांगणारे, "प्लास्टिक मुक्तीदूत" व स्वच्छतादूत ही दिंडीत सहभागी होते तर प्राण्यांची काळजी घेणारा पशुप्रेमी प्रतिनिधी धनगराच्या वेशात होता . तसेच आरोग्य ,स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती यासंबंधीची घोषवाक्य असलेले फलक घेतलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .मुलांना मनमुराद आनंद देणारे पाऊल खेळणे ,फुगडी खेळणे यासारख्या सांप्रदायिक खेळाचा मुलाने आनंद घेतला .अशा उत्साही वातावरणात गावकरी व शिक्षक व महिला वर्गांनाही फुगडीचा मोह आवरला नाही .
यासाठी श्री देवीदास गायकवाड ,शिवाजी वेदपाठक ,विठ्ठल नरवडे, प्रशांत वैद्यकर, मनोज पाटील ,पांडुरंग जावळे, बाळू मुंडे ,गुणवंत चव्हाण , माधव मोरे ,अंजली निकते यांनी विशेष योगदान दिले .शेवटी श्री विठ्ठल नरवडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .
मुलांच्या मदतीने तयार केलेल्या पालखीत संत प्रतिमा ,ज्ञानेश्वरी ग्रंथ याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्यात कामी महत्त्वपूर्ण असलेल्या वृक्षांचे महत्त्व ,वृक्ष लागवड व त्यांचे जतन करणे ही चळवळ बनावी यासाठी पालखीत वृक्षांचे रोपटे ठेवून त्याचेही पूजन करण्यात आले ." वृक्ष म्हणू की ऋषी म्हणून ते तर जनहित दक्ष " या वचनाची सत्यता पटवून देणे व ते जोपासने याबाबत यातून आवाहन करण्यात आले. या बाल दिंडीत विठ्ठल, रुक्मिणी ,महादेव ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, नारद मुनी ,संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या लक्षवेधी व आकर्षक वेशभूषा मुलांनी साकारल्या होत्या .तसेच इतर सर्वांनी वारकरी वेशात दिंडीत सहभाग घेतला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत दिंडी गावातील प्रदक्षिणा मार्गावरून निघाली. यावेळी गावातील भाविकांनी आपापल्या घरासमोर दिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली व दिंडीचे पूजन करून दर्शनही घेतले. या सोहळ्यात गावातील भजनी मंडळ ,भाविक महिला व नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिंडीत रंगत आणली तर झेंडेकरी टाळकरी यांचे "गोल रिंगण" हे या सोहळ्याचे आकर्षणाचे केंद्र ठरले .
संस्कृती व परंपरा जपत सध्याच्या काळात समाजासाठी उपयुक्त व गरजेचे संदेशही उपक्रमाच्या माध्यमातून दिले गेले. वृक्षसंपदा वाढवा असे सांगणारा "वृक्षराजा"ही साकारला होता तर पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचे दुरुपयोग, प्लास्टिक बंदीची उपयुक्तता सांगणारे, "प्लास्टिक मुक्तीदूत" व स्वच्छतादूत ही दिंडीत सहभागी होते तर प्राण्यांची काळजी घेणारा पशुप्रेमी प्रतिनिधी धनगराच्या वेशात होता . तसेच आरोग्य ,स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती यासंबंधीची घोषवाक्य असलेले फलक घेतलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते .मुलांना मनमुराद आनंद देणारे पाऊल खेळणे ,फुगडी खेळणे यासारख्या सांप्रदायिक खेळाचा मुलाने आनंद घेतला .अशा उत्साही वातावरणात गावकरी व शिक्षक व महिला वर्गांनाही फुगडीचा मोह आवरला नाही .
यासाठी श्री देवीदास गायकवाड ,शिवाजी वेदपाठक ,विठ्ठल नरवडे, प्रशांत वैद्यकर, मनोज पाटील ,पांडुरंग जावळे, बाळू मुंडे ,गुणवंत चव्हाण , माधव मोरे ,अंजली निकते यांनी विशेष योगदान दिले .शेवटी श्री विठ्ठल नरवडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले .