नळदुर्ग :- एकेकाळी विकासापासून वंचित असलेला आलियाबाद हा गाव पाहिल्यानंतर समाधान वाटते. कारण येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण व गावातील विकासात्मक कामे, स्वच्छता मोहीम ही अतिशय स्तुत्य बाब असून पुढील काळात या गावाला उज्ज्वल भविष्य आहे. अशा स्पर्धेतून गाव विकासासाठी संधी मिळते, या संधीतून इतर गावानी सुध्दा स्मार्ट ग्राम करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन औरंगाबादचे सहाय्यक आयुक्त शाम पटवारी यांनी केले.
आलियाबाद ता. तुळजापूर या स्मार्ट गावास गुरुवार दि. 26 जुलै रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात आदर्श कामगिरी केलेल्या कामाचे विभागस्तर मुल्यमापन समितीच्या सदस्यांनी भेट देवून पाहणी करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा सहाय्यक आयुक्त शाम पटवारी हे बोलत होते. प्रारंभी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत समितीच्या सर्व सदस्यांचे बैलगाडीतून वाजत गाजत जल्लोष स्वागत केले.
आलियाबाद ग्रामपंचायत व ग्रामस्थानी एकत्रित येवून लोकसहभागातून हागणदारीमुक्त अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्ष लागवड, परिसर स्वच्छता, वॉटर एटीएम, सौर पथदिवे आदीसह विविध विकासात्मक कामे केल्याने गावाचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे. एकंदरीत, या गावाची पाहणी करण्यासाठी विभागीय पथकाने भेट देवून समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी सरपंच ज्योती चव्हाण, उपमुख्यकार्यकारी अधिकारी देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, तुळजापूर पं.स. चे सभापती शिवाजी गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पंचायत समिती गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख, एम.एच. राऊत, स्वच्छता अभियानाचे समन्यवक रमाकांत गायकवाड, ग्रामसेवक प्रशांत भोसले, उपसरपंच सुर्यकांत राठोड, विस्ताराधिकारी कोंडिबा भांगे, तंटामुक्त अध्यक्ष नेमिनाथ चव्हाण, ग्रा.पं. सदस्य प्रकाश राठोड, थावरु राठोड, विलास राठोड, अमृत चव्हाण, दिनेश राठोड आदीजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश चव्हाण, सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी तर आभार रमाकांत गायकवाड यांनी मानले.