काटी :-  मनुष्याच्या जीवनात गुरु हे दिशादर्शक, दीपस्तंभ,मार्गदर्शक आहेत.आई-वडिल या जीवनाच्या आद्यगुरुप्रमाणेच चांगले शिक्षक वा गुरु आयुष्याला लाभणे महत्त्वपूर्ण व आवश्यक आहे.जीवनाला योग्य ती दिशा देऊन आपल्या जीवनाचे उन्नयन करण्याचे कार्य या गुरुंकडून सदोदित घडत असते.अशा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करुन पांगरदरवाडी ता. तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान करीत गुरुवंदना दिली.निमित्त होते -आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे!
         सकाळी परिपाठानंतर शाळेतील इ.5 वी ते 8 वी.च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत शाळेतील कार्यरत 8 शिक्षकांचा सन्मान करत गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी इ.1ली ते 8 वी.पर्यंतचे 154 विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेतील शिक्षकांविषयीचा आदर,प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सहशिक्षक शांताराम कुंभार, राजेश धोंगडे  यांनी गुरु शिष्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. 
      यावेळी मुख्याध्यापक उत्रेश्वर पैकेकरी,राजेश धोंगडे,प्रसाद डांगे,अनिल हंगरकर,हर्षवर्धन माळी,,श्रीमती.मिनाक्षी मगर आदीजण उपस्थित होते.

 
Top