नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील एकमेव शेतक-यांच्या
विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नळदुर्गचा श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर
कारखाना सुरू करण्याच्या हालचालींना अखेर यश आले आहे. नागपुर येथे सहकार
मंञ्याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २००५ च्या सहकार, पणन व वस्ञोद्योग
विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे श्री तुळजाभवानी कारखाना आसवानी प्रकल्पासह ९
वर्षाच्या कालावधीकरीता सहयोगी/सहभागीदारी तत्वावर चालवण्यास देण्यासाठी निविदा
प्रक्रिया राबविण्याचे ठरले आहे. यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील बहुसंख्य ऊस
उत्पादक शेतकरी, कामगार व व्यवसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना सन २०१२
पासून गाळपाविना बंद आहे. कारखान्यातील मशिनरी सुस्थितीत असून या कारखान्यावर
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज आहे. हा कारखाना
दिर्घमुदतीच्या सहयोगी तत्वावर चालवण्यास देण्यासाठी मागील आनेक महिन्यापासून
प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आमदार मधुकरराव चव्हाण यांनी वेळोवेळी
पाठपुरावा करून, सहकार मंञ्याची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न केले असून
सामाजिक कार्यकर्ते डा. सिद्रामाप्पा खजुरे यांनी कारखान्याच्या
कार्यक्षेञातील शेतक-यासह कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हा
कारखाना १८ वर्षाच्या दिर्घमुदतीसाठी सहयोगी तत्वावर देण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
माञ नागपुर येथील बैठकीत साखर आयुक्त यांनी सहकार पणन वा वस्ञउद्योग विभागाच्या
शासन निर्णयाच्या आधारे (दि. २९ नोव्हेंबर २००५ च्या शासन निर्णय) ९ वर्षाच्या
सहयोगी तत्वावर देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे ठरले आहे. या बैठकीस सहकार
मंञी, साखर आयुक्त पुणे, सहसंचालक (अर्थ) साखर आयुक्त पुणे, सहसंचालक
उपपदार्थ साखर आयुक्तालय पुणे, उपसचिव (साखर) सहकार पणन वस्त्रोद्योग, प्रादेशिक
सहसंचालक नांदेड, आवसायक एस.पी.रोडगे, प्रभारी कार्यकारी संचालक विकास भोसले आदीजण
उपस्थित होते.
सहकार मंत्री ना. सुभाष देशमुख, आमदार मधुकरराव चव्हाण, आ.
राणाजगजितसिंह पाटील, विधानपरिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर, सुरेश धस आदींनी शासन
दरबारी प्रयत्न
केल्याने कारखाना चालू करण्यास शासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.