बार्शी (गणेश गोडसे) :- 
चालत्या कारने अचानक पेट घेतल्यामुळे कार जळुन खाक होऊन 12 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना बार्शी- कुर्डुवाडी रस्त्यावर उपळाई रेल्वे स्टेशन जवळ घडली. 
शिवराज राजेंद्र लांडगे (वय २३ वर्षे, रा. शिवस्तान अपार्टमेंट, मानपाडा, ठाणे) यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, त्यांच्या कडे एम एच 01 बिएफ 3140 या क्रमांकाची स्कोडा कार आहे. पहाटे ते व त्यांचे दोन मित्र मीळून त्यांच्या मुळगावी कळंब, जि. उस्मानाबाद येथे जाण्यासठी निघाले. दुपारी ०३:३० वा. चे सुमारास ते टेंभुर्णी येथे येऊन गाडीत पेट्रोल भरुन पुन्हा कळंब येथे जाण्यासाठी निघाले. खांडवी येथे मुक्काम करूण आज दि. ०४ ऑगस्ट २०१८ रोजी रात्री जाण्यासाठी निघाले असता खांडवीच्या दिशेने जात असताना जुने उपळाई रेल्वे स्टेशनच्या अंदाजे ५० मी पाठीमागे त्यांच्या कारच्या डैशबोर्डमधुन पार्क झाल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी लगेचच गाडी रोडच्या बाजुला घेवुन गाडीतुन बाहेर येवुन बोनेट उघडण्यासाठी जात असताना बरोनेटमधुन धुर येवुन अचानक गाडीने पेट घेतला. त्या ठिकाणी आग विझवण्याची काही सोय नसल्याने गाडी काही मिनीटातचे पुर्णपणे पेटली. त्यात माझी गाडी पुर्णपणे जळून अंदाजे १२०००००/- रु. चे नुकसान झाले आहे.याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

 
Top