उस्मानाबाद :- धनगर समाजाला सर्वच राजकीय पक्षाचा अनुभव आला आहे. आमची मागणी मान्य करण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष पुढाकार घेत नाही. त्यामुळे धनगर समाजाचे स्वतंत्र पक्षविरहीत महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समिती तयार केल्याचे सांगितले. येत्या २७ ऑगस्टला प्रत्येक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर पारंपारिक वेशात धनगर समाजाच्यावतीने ढोल जागरण आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लहुजी शेवाळे यांनी उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सोमवार दि.२० ऑगस्टच्या सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत विठ्ठल रबदडे, सुरेश भुंमरे, दत्ता बंडगर, अॅड.खंडेराव चौरे, सक्षणा सलगर, महानंदा पैलवान, भारत डोलारे, डॉ.गोविंद कोकाटे, शाम तेरकर आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती देताना लहु शेवाळे यांनी सांगितले की, बारामतीमध्ये धनगर समाजाचे आरक्षण आंदोलन नारळ पाणी देऊन सोडताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाची सत्ता राज्यात आली तर पहिल्याच मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षण जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. गेल्या चार वर्षात मंत्रीमंडळाच्या २५० बैठका झाल्या पण एकाही बैठकीत धनगर आरक्षण विषय आला नाही. त्यामुळे धनगर समाजात राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेस प्रमाणेच भाजपाने ही आपल्या फसविल्याची भावना निर्माण झाली आहे. येत्या २० सिप्टेंबर पर्यंत सरकार ने धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावे, नसता राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण समितीने दिला आहे.
आ.रामराव वडकुते यांनी बोलताना सांगितले की, धनगर व धनगड एकाच असल्याचे सिध्द झाले आहे. त्यामुळे २१ सप्टेंबर पर्यंत धनगर आरक्षण जाहीर नाही केले तर ३० संप्टेबर रोजी समाजाचा एल्गार मेळावा परभणी येते घेण्यात येईल व आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे सांगितले. तर गणेश हाके यांनी धनगर समाजात भाजपा सरकार विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. फसविल्याची भावना निर्माण होत आहे. प्रथम सरकार ने सव्र्हेसन वगैरे करून संवेधानीक आरक्षण जाहीर करू, असे सांगितले. परंतू आता आंदोलना शिवाय पर्याय राहिला नाही, महाराष्ट्रात मराठवाडयात सर्वात जास्त धनगर समाज आहे.त्यामुळे आंदोलनाची सुरूवात मराठवाडयातून सुरू होईल असे सांगण्यात आले.