काटी :- तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे दि. 20 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता येथील बसस्थानक शेजारील जैन मंगल कार्यालयात काटी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्ता, बुथ कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यकर्ता मेळावा व बुथ कमिटी बैठकीस प्रारंभ झाला.
यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गावात बुथ कमिट्याची स्थापना केली. कमिटीमधील प्रत्येक सदस्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासात्मक कामे तळागाळातील लोकापर्यंत पोहोचवायचे काम करणे गरजेचे असून ही कामे सोशल मिडियाद्वारे सर्व लोकापर्यंत पोहंचविण्याचे आवाहन करुन काँग्रेस पक्षाचा इतिहास हा जुना असून पंडित जवाहरलाल नेहरू, स्वर्गीय इंदिरा गांधी, स्वर्गीय राजीव गांधी आदी नेत्यांनी जनतेसाठी त्याग केला आहे. त्यागाची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी माझ्या राजकीय जीवनात विविध विकास कामे केली, सर्व जातीधर्मातील लोकांना काम करण्याची संधी दिली. समाजामध्ये एकता नांदावी यासाठी प्रयत्न केले. राज्यात चार कृषी विद्यापीठाची स्थापना केली. तालुक्यात 80 साठवण तलाव केले असल्याचे सांगून आज तालुक्यात एक हजार एकर द्राक्षबागेची लागवड झाली हे कशाचे द्योतक आहे प्रतिप्रश्न उपस्थितांना विचारला. काँग्रेस सरकारच्या काळात 700 कोटीची सरसगट कर्जमाफी केली होती परंतु भाजप सरकारने कर्जमाफी देताना अनेक जाचक अटी घालून चाळण लावून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा केली. अनेक फसव्या घोषणा केल्या अशा फसव्या सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आपसातील मतभेद, हेवेदावे बाजूला सारून एकत्रितपणे काँग्रेस पक्षाच्या बाजूने राहण्याचे आवाहन करुन भाजपला हद्दपार करण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यानी एकदिलाने कामाला लागावे असे आवाहन केले.
यावेळी सभापती शिवाजीराव गायकवाड, जि.प. सदस्य अॅड. धिरज पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अमर मगर यांची भाषणे झाली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य धिरज पाटील, सभापती शिवाजीराव गायकवाड, तालुका अध्यक्ष अमर मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष बोबडे, चंद्रशेखर वडणे, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, माजी उपसभापती विलास डोलारे, शरनाप्पा कबाडे, सयाजीराव देशमुख, उत्तमराव माने, नरसिंह धावणे, अरविंद भडंगे, नेताजी कदम, गौरीशंकर नकाते, राजेंद्र डोलारे, गौरीशंकर कोडगिरे, दत्तात्रय लिंगफोडे, प्रमोद माने, दादासाहेब काढगावकर, राजाभाऊ फंड, विनायक करंडे, अमोल माने, बाळासाहेब माने, राम गंजे, आप्पा काळे, धनाजी काशिद, भैय्या कुलकर्णी, बाळासाहेब डोके आदीसह काटी जिल्हा परिषद गटातील काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी उपसभापती विलास डोलारे यांनी केले तर आभार उपसरपंच आनंद बोबडे यांनी मानले.
व्हिडिओ पहा -
व्हिडिओ पहा -