खानापूर (बालाजी गायकवाड) :-
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे आयोजित केलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने दि.१९ रोजी करण्यात आली.
येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या ग्रंथराज पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताहाचे हे १२ वे वर्ष होते.या सप्ताहास प्रारंभ दि.१३ रोजी ह,भ.प शाम महाराज माळी (काटगाव) कल्याण महाराज शिंदे (येवती) यांच्या अधिष्ठानाखाली करण्यात आला होता.यामध्ये सकाळी काकडा आरती,ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन,गाथा भजन,प्रवचन,नामजप ,सायंकाळी हरिपाठ भजन कीर्तन,व हरिजागर असा नित्यक्रम होता. दि.१९ रोजी गावामधून ग्रंथाची टाळ-मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून गोल रिंगण घेणात आले.यानंतर आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांचे काल्याचे कीर्तन झाले यानंतर महाप्रसादाचे वाटप करून सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या सप्ताहास प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर,ह.भ.प नीलकंठ महाराज दिंडेगावकर,पंढरीनाथ महाराज दिंडेगावकर यांची उपस्थिती होती .
हा सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. सप्ताहास पंचक्रोशीतील महिला,तरुणवर्ग,सह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.