लोहारा (इकबाल मुल्ला) :- राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते विकासाचे राजकारण करण्या ऐवजी सध्या श्रेयवादाचेच राजकारण करण्यात मशगुल आहेत. भाजपचे केंद्र व राज्यातील शासनाकडुन कामे मंजुर झाली किंवा निधी आला कि, आम्ही आणले म्हणण्याचा सपाटाच लावला आहे. आता तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी चक्क मंजुर नसलेल्या भुम,परंडा,वाशी तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत 10 कोटीचा निधी मंजुर करुन घेतल्याच्या बातम्या दिल्या आहेत.हि कामे मंजुर व शासनाची प्रशासकीय मान्यता नसतानाच,इतकेच काम तर जे केलेले नाही त्याचे स्वत:चे फोटो टाकुन फ्लेक्स/ग्राफ्किस करुन सोशल मिडीयावर टाकले. आता तर श्रेयवादाची हद्दच पार केल्याचा आरोप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकात केला आहे.

ना.पंकजाताई मुंडे यांनी आ.सुजितसिंह ठाकुर यांना 25 कि.मि. व आ.मधुकरराव चव्हाण यांना 5 कि.मि. व आ.ज्ञानराज चौगुले यांना 4.70 कि.मि.या प्रमाणे कोटा दिला असुन त्यातुन आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या शिफारसीने रस्त्याचे कामे प्रस्तावित असुन या कामांना अद्याप मंजुरी व निधी नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गल्ली ते दिल्ली सत्ता असताना कांही केले असते तर, या भागातील जनतेला आज तुमच्या दुष्कर्माची फळे भोगावी लागली नसती.आता किमान फुकटचे श्रेय घेण्यासाठी श्रेयवादाचे राजकारण तरी करु नका,आघाडी सरकारच्या एकुण 15 वर्षा पेक्षा अधिक निधी कमी काळात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने या भागाला दिला आहे. विकास कामे व निधी आणण्याचे चर्चेचे खुले आव्हान आ.सुजितसिंह ठाकुर यांनी प्रसिध्दी पत्रकात केले आहे.