हंजगी ( यशवंत पाटील ) :
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी,जेऊर,कोन्हाळी या भागात पावसाळा सुरू झाल्या पासून आजपर्यंत मोठा पाऊस झालेला नाही.या मुळे या भागातील विहीर,बोअरवेल पूर्ण पणे कोरडे पडले आहेत.हंजगी-जेऊर गटात इतके दिवस पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा नळाला चार ते पाच घागरी पाणी येत होते.हेच पाणी गावकरी पिण्यासाठी आठवडाभर ठेवत होते.आणि घरी वापरण्यासाठी मात्र बाहेरुन भटकंती करीत शेतावर जाऊन आणत होते.परंतु गेल्या आठ-दहा दिवसात या गावातील पिण्याच्या पाण्याचे चित्र पुर्ण पणे बदलले गेले आहे.
मागच्या पंधरवडा पासून पाऊस नाही,पाणी नाही.फक्त वार्याचा जोर अधिक वाढल्याने विहीर व बोअरवेल मधील थोडेफार असलेले पाणी ही अटून गेल्याने,सध्या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाले आहे.या मुळे गावकरी पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात.या गावातील शाळा,अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाणी बाहेरुन आणावी लागत आहे.तर या भागातील काही कुटूंब पाण्यासाठी शेतातच वास्तव करताना दिसतात.गेल्या दोन वर्षां पासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणारा हंजगी-जेऊर गटात यंदा ही भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करताना नागरिक दिसतात. काही गावात पिण्यासाठी पाणी अक्कलकोट वरुन टॅकरद्वारे मागविली जात आहे.एका टॅकरला एका खेपेस 1400, रुपये मोजावे लागत आहे.तर काही नागरिक टमटम मध्ये सिन्टेक्स टाकी ठेवून घरी पाणी आणताना दिसतात.
खरीप पीके सध्या ऑक्सिजनवर
यंदा या भागात खरीप पीका पुरताच रिमझिम पाऊस झाला आहे.या पावसावरच या भागातील शेतकर्यांनी खरीप पीकाची पेरणी केली आहे. पेरणी नंतर ही थोडेफार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे वाढ चांगल्याप्रकारे झाली होती.या मुळे शेतकर्या मध्ये समाधान व्यक्त होत होते. परंतु जुलै महिन्यात खंड पडलेला पाऊस ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही.या भागातील खरीप पीके सध्या ऑक्सिजनवर उभी आहेत.तर साधारण जमीनितील खरीप पीके मात्र करपून चालली आहेत.
स्प्रिंक्लरच्या साह्य़ाने पीके वाचविण्याची धडपड
विहीरीत थोडेफार पाणी असलेले शेतकरी स्प्रिंक्लरच्या साह्य़ाने पीके वाचविण्याची धडपड सुरू आहे.या बिकट परस्थिती मुळे येथील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.वरुणराजाची प्रतिक्षा करुन शेतकरी व गावकरी थकले आहेत.तर काही शेतकरी वरुणराजांना शाप देताना ही दिसतात.सध्या या भागात मूग,उडीद,सोयाबीन व पेरणी केलेला कांदा करपू लागले आहेत. गेल्या खरीप हंगामात ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.तेव्हा तालुक्यातील सर्वच शेतकर्यांनी खरीप पीकावर नांगर चालविले होते.या मुळे यंदा ही गेल्या हंगामा सारखीच परस्थिती निर्माण होईल की काय अशी भीती येथील शेतकर्यांना वाटत आहे.
गावकरी आणि शेतकरी भीषण आस्मानी संकटात
काही शेतकर्यांनी खरीप पीकावर बॅक कर्ज ही घेतले आहेत.घेतलेले बॅक कर्ज परतफेड करायची कशी अशी चिंता या भागातील शेतकर्यांना सध्या सतावत आहे.येत्या चार ते पाच दिवसात पाऊस झाल्यास बळीराजांना दिलासा मिळेल.अन्यथा संपूर्ण खरीप पीकावर नांगर चालवून रब्बी हंगामा करीता जमीन मोकळे ठेवावे लागेल.एकंदरीत या वरुणराजाच्या अवकृपेने या भागातील शेतकरी आणि गावकरी भीषण आस्मानी संकटात सापडला आहे.या भागात मोठा पाऊस कधी होणार,आणि पाणी टंचाई कधी दूर होईल अशी चिंता येथील गावकर्यांना सध्या सतावत आहे.तरी संबंधित प्रशासन या गावाकडे लक्ष घालून पाणी टंचाईवर काही तरी उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिक करतात.
अक्कलकोट तालुक्यातील हंजगी,जेऊर,कोन्हाळी या भागात पावसाळा सुरू झाल्या पासून आजपर्यंत मोठा पाऊस झालेला नाही.या मुळे या भागातील विहीर,बोअरवेल पूर्ण पणे कोरडे पडले आहेत.हंजगी-जेऊर गटात इतके दिवस पाच ते सहा दिवसाआड पाणी पुरवठा नळाला चार ते पाच घागरी पाणी येत होते.हेच पाणी गावकरी पिण्यासाठी आठवडाभर ठेवत होते.आणि घरी वापरण्यासाठी मात्र बाहेरुन भटकंती करीत शेतावर जाऊन आणत होते.परंतु गेल्या आठ-दहा दिवसात या गावातील पिण्याच्या पाण्याचे चित्र पुर्ण पणे बदलले गेले आहे.
मागच्या पंधरवडा पासून पाऊस नाही,पाणी नाही.फक्त वार्याचा जोर अधिक वाढल्याने विहीर व बोअरवेल मधील थोडेफार असलेले पाणी ही अटून गेल्याने,सध्या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाले आहे.या मुळे गावकरी पाण्यासाठी भटकंती करताना दिसतात.या गावातील शाळा,अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पाणी बाहेरुन आणावी लागत आहे.तर या भागातील काही कुटूंब पाण्यासाठी शेतातच वास्तव करताना दिसतात.गेल्या दोन वर्षां पासून भीषण पाणीटंचाईचा सामना करणारा हंजगी-जेऊर गटात यंदा ही भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करताना नागरिक दिसतात. काही गावात पिण्यासाठी पाणी अक्कलकोट वरुन टॅकरद्वारे मागविली जात आहे.एका टॅकरला एका खेपेस 1400, रुपये मोजावे लागत आहे.तर काही नागरिक टमटम मध्ये सिन्टेक्स टाकी ठेवून घरी पाणी आणताना दिसतात.
खरीप पीके सध्या ऑक्सिजनवर
यंदा या भागात खरीप पीका पुरताच रिमझिम पाऊस झाला आहे.या पावसावरच या भागातील शेतकर्यांनी खरीप पीकाची पेरणी केली आहे. पेरणी नंतर ही थोडेफार पाऊस झाल्याने खरीप पिकांचे वाढ चांगल्याप्रकारे झाली होती.या मुळे शेतकर्या मध्ये समाधान व्यक्त होत होते. परंतु जुलै महिन्यात खंड पडलेला पाऊस ऑगस्ट महिना सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही.या भागातील खरीप पीके सध्या ऑक्सिजनवर उभी आहेत.तर साधारण जमीनितील खरीप पीके मात्र करपून चालली आहेत.
स्प्रिंक्लरच्या साह्य़ाने पीके वाचविण्याची धडपड
विहीरीत थोडेफार पाणी असलेले शेतकरी स्प्रिंक्लरच्या साह्य़ाने पीके वाचविण्याची धडपड सुरू आहे.या बिकट परस्थिती मुळे येथील शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.वरुणराजाची प्रतिक्षा करुन शेतकरी व गावकरी थकले आहेत.तर काही शेतकरी वरुणराजांना शाप देताना ही दिसतात.सध्या या भागात मूग,उडीद,सोयाबीन व पेरणी केलेला कांदा करपू लागले आहेत. गेल्या खरीप हंगामात ही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.तेव्हा तालुक्यातील सर्वच शेतकर्यांनी खरीप पीकावर नांगर चालविले होते.या मुळे यंदा ही गेल्या हंगामा सारखीच परस्थिती निर्माण होईल की काय अशी भीती येथील शेतकर्यांना वाटत आहे.
गावकरी आणि शेतकरी भीषण आस्मानी संकटात
काही शेतकर्यांनी खरीप पीकावर बॅक कर्ज ही घेतले आहेत.घेतलेले बॅक कर्ज परतफेड करायची कशी अशी चिंता या भागातील शेतकर्यांना सध्या सतावत आहे.येत्या चार ते पाच दिवसात पाऊस झाल्यास बळीराजांना दिलासा मिळेल.अन्यथा संपूर्ण खरीप पीकावर नांगर चालवून रब्बी हंगामा करीता जमीन मोकळे ठेवावे लागेल.एकंदरीत या वरुणराजाच्या अवकृपेने या भागातील शेतकरी आणि गावकरी भीषण आस्मानी संकटात सापडला आहे.या भागात मोठा पाऊस कधी होणार,आणि पाणी टंचाई कधी दूर होईल अशी चिंता येथील गावकर्यांना सध्या सतावत आहे.तरी संबंधित प्रशासन या गावाकडे लक्ष घालून पाणी टंचाईवर काही तरी उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिक करतात.