बार्शी (गणेश गोडसे) :
निसर्गरम्य परिसरातील शाळा विद्यार्थ्यांची प्रगती साधत असुन प्रशालेचे असंख्य विद्यार्थी राज्यात आपले व शाळेचे नाव उज्वल करत आहेत ही बाब खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य के.वाय.ईंगळे यांनी केले.ते येरमाळा येथील विद्यानिकेतन प्रशालेत स्पर्धा परिक्षेसह विविध गुणवंतांच्या गुणगौरव कार्यक्रम व ई लर्निंग उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच विकास बारकुल होते.यावेळी व्यासपीठावर संस्थापक सचिन पाटील,दता बारकुल,मनोज बारकुल,शरद बारकुल,तुषार वाघमारे,पत्रकार गणेश गोडसे,नंदकुमार जगदाळे, रवि बारकूल,संतोष आगलावे,वल्लभ माशाळकर,परवेज काजी,बाळासाहेब थोरबोले आदी उपस्थित होते.
ईंगळे पुढे बोलताना म्हणाले की समाजाचे प्रतिनिधित्व शाळा करत असते.शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परिक्षेत उल्लेखनीय यश संपादन करूण प्रगती साधत आहेत.व्यासांनी सर्वांना ज्ञान दिले.आजच्या दिवशी विशेष प्राविण्य मिळवलेल्याचा सत्कार हा योग खुप मोठा आहे.
तिन गोष्ठीवर गुरूचे वर्णन केले.अनुभव माणसाला बहुमोल मार्गदर्शन करतो.जसे अनुभव येत जातील तसे तुम्ही घडत जाता.कष्ठ करण्याची जिद्द असल्यास कोणतीच गोष्ट अशक्य नसते.मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवा.त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत चालले आहे.खाण्यावरील खर्च कमी करूण मुलांना पुस्तके भेट द्या तीच पुस्तके मुलांचे चांगले मित्र बनतील.विकास बारकुल यावेळी बोलताना म्हणाले की शाळेबरोबरच पालकांनीही आपल्या पाल्याकडे लक्ष दिले पाहिजे.यावेळी नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह शिक्षिका अश्विनी वरपे,उज्वला भातलवंडे यांचा सन्मान करण्यात आला.सुत्रसंचालन सुषेन जाधवर यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन पाटील,अनिल डोके, प्राचार्या देवकन्या पखाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.