उस्मानाबाद :- राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची उस्मानाबाद जिल्हा कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष आ. विजयराव शिंद यांनी प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केली. उस्मानाबाद येथील श्री समर्थ मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, राष्ट्रीय महिला अध्यक्षा अनुपमा गुरव , गुरव उद्योजक व संघटक बाळासाहेब गुरव यांच्या उपस्थितीत पुढील कार्यकारणी निवड करण्यात आली.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदावर भालचंद्र धारूरकर, उपाध्यक्ष डॉ.जयराज पटवारी, प्रदिप मोकाशे, समाधान बेद्रे, सरचिटणीसपदी महेश मोटे यांची निवड करण्यात आली. तर जिला महिला आघाडी अध्यक्षपदी अॅड. श्रीमती स्वाती नळेगांवकर, सरचिटणीस अनिता पाटील, सहचिटणीस वैशाली बिराजदार यांची निवड करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्हा युवा आघाडी अध्यक्षपदी रवि गुरव तिर्थकर, उपाध्यक्ष सुनिल तिर्थकर, सरचिटणीस पदी अमोल पटवारी यांची निवड करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा पदवीधर आघाडी अध्यक्षपदी मोहन पाटील यांची निवड करण्यात आली.
तर तालुका कार्यकारणीमध्ये उस्मानाबाद तालुका अध्यक्षपदी राजेंद्र सुभाष पाटील, सरचिटणीस पदी मिलिंद पाटील, तुळजापूर तालुका अध्यक्षपदी रामेश्वर गुरव, उपाध्यक्षपदी प्रदिप गुरव, लोहारा ताल़ुका अध्यक्षपदी महेश मक्तेदार, उपाध्यक्षपदी अमोल गुरव, सरचिटणीसपदी किरण निंबाळकर, कळंब तालुका अध्यक्षपदी परमेश्वर अगलावे, भूम तालुका अध्यक्ष पदी तानाजी खामकर तर उस्मानाबाद शहर आघाडी अध्यक्षपदी श्रीनिवास पाटील, उपाध्यक्ष केंशव पाटील, सरचिटणीस दत्तात्रय गुरव यांची नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
निवड झाल्यानंतर सर्व नवीन पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर उर्वरित कार्यकारणी सदस्यांची लवकरच निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष भालचंद्र धारूरकर यांनी यावेळी दिली.