उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत व कोळी या समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी आज बुधवार दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. 
   प्रारंभी सकाळी साडे दहा वाजता उस्मानाबाद नगरपालिकेसमारील हुतात्मा स्मारकास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात माजी कॅबिनेट मंत्री तथा तुळजापूरचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, विश्वास शिंदे, शिला अंबरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येनी सहभागी झाले होते. 

 
Top