तुळजापूर :- बहुजन स्वाभिमान संघटनेच्यावतीने मुस्लिम समाजाला शिक्षण व नौकरीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शुक्रवार तुळजापूर तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नायब तहसिलदार अमित भारत यांच्याद्वारे निवेदन पाठवण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, सामाजिक स्तरावर मुस्लिमांची परिस्थिती हलाखीची असून शैक्षणिक सवलती नसल्यामुळे मुस्लिम समाज शिक्षणापासून वंचित आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाद्वार जिल्हाध्यक्ष तुकाराम जेटीथोर, तालुकाध्यक्ष उमेश सिध्दगणेश आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
    सदरील धरणे आंदोलन सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत करण्यात आले. यावेळी फिरोज पठाण, अंकुश सिध्दगणेश, दादासाहेब मस्के, आसिफ शेख, नाना शितोडे, आशपाक सतार, आरिफ बागवान, अकसर शेख, रसूल बागवान, तौफिक शेख, हाजी जावेद आदीजण उपस्थित होते. 
 
Top