तुळजापूर :- तुळजापूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार रस्तेमार्गाची गरज असून त्याच्या निर्मितीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करित असल्याचे प्रतिपादन आ.मधुकरराव चव्हाण यांनी केले. ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सिंदफळ - राखेल - धनेगाव - कुंभारी - कोरेवाडी - देवकुरुळी या साडे सतरा किमी लांबीच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी कुंभारी येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
पुढे बोलताना आ.चव्हाण म्हणाले की, रस्ते या विकासाच्या धमन्या असून विकासाचे लोण सर्वत्र पसरण्यासाठी रस्ते महत्वाची भूमिका करतात. तालुक्यामध्ये सिंचनाच्या सोयी मोठया प्रमाणात केल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली असून सामाजिक सुधारणेतही वाढ होत आहे. आर्थिक स्थिती झपाटयाने बदलत असून आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन व पर्यटनसाठी दर्जेदार रस्ते आवश्यक बनले आहेत. त्यासाठी राज्य सरकार, डी.पी.डी.सी. व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जास्तीत जास्त निधी खेचण्याचा प्रयत्न केला आहे.
परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांना सुरळीत वीज मिळत नाही, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. पिकविमा भरण्यासाठी सुविधा नाहीत, संरक्षित पाणी नाही, कृष्णा खोऱ्यातील कामासाठी पुरेशी तरतूद नाही. भाजप सरकार फक्त घोषणा करते कार्यवाही काहीही करत नाही. शेतकरी कोलमडून गेला आहे. कर्जमाफी चे धोरण कळत नाही. त्यामुळे आत्महत्येत वरचेवर वाढ होत आहे. हे सरकार सर्व  आधारावर अपयशी ठरले असून समाजातील कोणताही घटक सुखी व समाधानी नाही अशी घणाघाती टिकाही आ.चव्हाण यांनी भाजप सरकारव केली. यासह पिंपळा  खु. येथे माळुंब्रा - गोंधळवाडी -पिंपळा खु. -पिंपळा बु.-देवकुरुळी -धोत्री -खडकी ते जिल्हा सरहदद या 17.750 किमी रस्त्याचे भूमिपूजन मौजे पिंपळा खु.येथे केले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, महिला काँग्रेस आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ.राजलक्ष्मी गायकवाड,माजी जि.प.बांधकाम सभापती मुकुंद डोंगरे, माजी सभापती संतोष बोबडे, पं.स.सभापती शिवाजी गायकवाड, पं.स.सदस्य शिवाजी साठे, चंद्रशेखर वडणे, सुरेश भाऊ डोंगरे,तात्या तांबे, तुकाराम धनके, शिवाजी गवळी,सुरेश कोकरे, सुनिल चव्हाण,अशोक बचाटे, रसिक वाले, वसंत फुलारी, चंद्रहार वडणे, हमीद पठाण, बापू घोंगते, नेताजी शिंदे,रुबाब पठाण,अंगद इंगळे, गणेश गंजे, साहेबराव जाधव,दत्ता मस्के,विठठल गुंड,गजेंद्र बोचरे, सुनिल नकाते, अमृत मोटे, बालाजी चुंगे, लालसिंग चव्हाण,महादेव जाधव,डॉ.गुरव, नागनाथ चौगुले, हणमंत गवळी, ज्ञानेश्वर जगताप यांचेसह उपरोक्त मार्गावरील सर्व गावातील सरपंच, चेअरमन यांचेसह सर्व कार्येकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सदरील भागात 35 किमी रस्त्यासाठी रु.19 कोटी मंजूर असून सदरील रस्त्यावरील 58 पुलांचा समावेश आहे. तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रीटकरण करण्यात येणार आहे. कामाची कालावधी 1 वर्षाचा आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.नरवडे यांनी केले तर आभार तात्या तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कुंभारी व पिंपळा खु. येथील नागरिकांनी कष्ट घेतले. सदरील कामामुळे उपरोक्त गावातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 
Top