उस्मानाबाद  :- दि.  1५ ऑगस्ट 2018 पुर्वी धनगर जमातीस अनुसूचित जमाती (एसटी) चे जात प्रमाणपत्र वितरीत व्हावे व  चौंडी प्रकरणातील गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावेत, या व इतर प्रमुख मागणीसाठी धनगर आरक्षण अंमलबजावणी समिती च्या वतीने दि.16 ऑगस्ट 2018 ते दि 28 ऑगस्ट 2018 तुळजापुर ते चौंडी अशी 200 कि.मी अंतराची भाजप सरकार चलेजाव यात्रा आयोजित केली आहे. अशी माहिती या पदयात्रेचे प्रमुख सुरेश भाऊ कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपचे अॅंड.खंडेराव चौरे व राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या सक्षणा सलगर यांना समाज आरक्षणासाठी पक्षत्याग करणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी समाजासाठी आम्ही तयार आहोत, असे सांगितले. 
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस बाळासाहेब किसवे, रामभाऊ लांडे, किशोर मासाळ, काकासाहेब मारकड, गणेश सोनटक्के, सक्षणा सलगर, अँड खंडेराव चौरे, भारत  डोलारे, दत्ता बंडगर, कमलाकर दाणे, अण्णा बंडगर, सुनील पाटील, बालाजी बंडगर, पंडित बंडगर, प्रदिप पाडुळे, देवकर सर, तानाजी सोनटक्के, राजाभाऊ सोनटक्के, किशोर मासाळ, डॉ.राधाकृष्ण लोंढे, सोमनाथ लांडगे, इंद्रजित देवकत, रामभाऊ लांडे  उपस्थित होते. 
तुळजापूर मध्ये जागर घालून आंदोलनास सुरूवात होणार आहे. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी असून चौंडी मध्ये ५ लाख लोक जमतील असा अंदाज आहे. या बैठकीत या पदयात्रेच्या नियोजनाबाबत ही चर्चा करण्यात आली.
 
Top