बार्शी (गणेश गोडसे ) :-

पुणे-लातुर राज्यमार्गावर पांगरीपासुन 2 कि.मी. वर अंतरावर बालाघाटाच्या पर्वतरांगाच्या पायथ्याला व प्रभु रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या  स्वयंभु श्री.निलकंठेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. नीलकंठेश्वराच्या दर्शनासाठी येथे भाविकांची सतत गर्दी असते.निसर्गरम्य वातावरणामुळे भाविक पर्यटक आणि शालेय सहलींसाठी विदयार्थीची निलकंठेश्वराला पहिली पसंती ठरत आहे.     

मंदिर हेमाडपंथी असुन हे प्रचंड व अखंड शिलांनी बनवलेले आहे. सुमारे 30 वर्षापुर्वी राजस्थानी कलाकारांकडुन या शिलामंदिरास सुबक कलाकॄतींनी सजवण्यात आले आहे. या मंदिराच्या वैभवात प्रत्येकवर्षी भर पडत आहे.पुरातन काळात हा भाग दंडकारण्य म्हणुन ओळखला जात असे अशी आख्यायिका सांगितली जाते. रावणाने मायावी हरणाच्या रूपात येऊन सीतेचे अपहरण करून पळाल्यानंतर प्रभु रामचंद्र सितेचा शोध घेत घेत दंडकारण्यात फिरत फिरत या ठिकाणी आले होते. येथिल निसर्गरम्य व नयनरम्य वातावरणामुळे प्रभु श्रीरामांना मोहिनी घातली. या वातावरणामुळे प्रभु रामचंद्रांची शिव पुजा करण्याची इच्छा झाली.त्याच क्षणी पॄथ्वीच्या उदरामधुन शिवलिंग प्रकट झाले, यामुळे या स्थानास  स्वयंभु निलकंठेश्वर असे नांव पडले अशी अख्यायिका सांगितली जाते.      

मंदिराच्या ऊत्तरेस उंच डोगर असुन डोगरावर नंदी आहे तो नंदी प्रत्येकवर्षी फक्त गहुभरच शिवलिंगाच्या दिशेने पुढे सरकतो ज्यावेळी नंदीदेव निलकंठेश्वरांच्या मंदिरात पोहोचेल तेव्हा जगबुडी होऊन सर्व जग पाण्याखाली येर्इल अशीही आख्यायिका येथील नंदीसंदर्भात अणेक वर्षांपासुन बुजुर्गांमधुन सांगितली जाते.निलकंठेश्वर मंदिरामधील मुख्य लिंगावर एक छिद्र असुन त्यातुन सतत पिंडावर पाणी पाझरत असते.भाविकांत जागॄत स्थान म्हणुन ख्याती पसरली आहे. मंदिराच्या समोरूनच पुणे लातुर राज्य मार्ग गेला असुन मंदिरासमोरूनच निलकंठा नदी वाहत असुन या मुळे तर मंदिराच्या सौदर्यात अधिकच भर पडली आहे. मंदिर सर्व बाजुंनी झाडांनी वेढलेले आहे.तसेच डोंगरावर मंदिरअसल्यामुळे व सगळकडे हिरवार्इची चादर पसरलेलीअसल्यामुळे मंदिरात जाताना मन प्रसन्न होऊन जाते. मंदिराच्या दक्षिण दिशेला मूख्य प्रवेशदार असुन तेथे भाविकाच्या खर्चातुन दिव्यभव्य असे प्रवेशदार बांधण्यात आले आहे.              

मंदिरात महाशिवरात्रीस अखंड हरिनाम सप्ताह ,दसरा,गुढी पाडव्याला तसेच प्रत्येक महिण्याच्या पौणिमेला मोठी यात्रा भरते. श्रावण महिन्यात व प्रत्येक सोमवारी पुजा अर्चा किर्तन हरिजागर आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन पांगरी पंचक्रोशीमधील भाविकाकडुन मोठया उत्साही वातावरणात केले जाते. शासनतर्फे निलकंठेश्वराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला असुन 24 लाखांचा निधी उपलब्ध होउन तो खर्च करण्यात आला आहे.गतवर्षी शासनाच्या विकास निधीमधुन यात्री निवाससाठी पाच लाख रूपयांचा निधी मंदिरासाठी प्राप्त झाला असुन यात्रीनिवासाचे कामही पुर्ण करन्यात आले आहे. मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी आनखी निधीची आवश्यक्ता आहे.राज्य पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक व तत्कालीन जिल्हाअधिकारी श्री.जगदिश पाटील यांनी तिर्थक्षेत्र श्रीनिलकंठेश्वराच्या परिसराला पर्यटन क्षेत्र म्हणुन विकास करण्यासाठी पुढाकार घेतला होेता. पर्यटनविकास महामंडळाकडुण या परिसराचा विकास करण्यात येणारअसल्यामुळे विविध कंपण्यांकडुन तसे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. नुकतेच येथील  जुन्या सभागृहालगतच नव्याने दुसरे सभागृहासाठी निधी मंजुरी देण्यात आली आहे. 
 
Top