बार्शी (गणेश गोडसे) :-
तांदुळवाडी ता.बार्शी येथील सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीतपणे यश संपादन केले आहे. प्रशालेचा एक विद्यार्थी राज्य द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने फेब्रुवारी 2018 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत सुयश विद्यालयाचा मधुसुदन जाधवर याने 300 पैकी 270 गुण प्राप्त करून ग्रामीण विभागातुन राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पाचवी मधील रोहित गाभणे(252),आरजु शेख (236),मुनाफ शेख (224),वैष्णवी नलावडे(216),अथर्व गवळी(216),अविष्कार सुर्वे(214),आर्यण वाघमारे( 210)हे 8 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले.तर आठवीचे अर्चना यादव (222),अभिषेक दत्तात्रय गोडसे(220),प्रणव जाधव (216),अशोक खळदकर (200),महेश सुरवसे(176) हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.पाचवीतील 50 विद्यार्थी परिक्षेस बसले होते त्यापैकी 42 तर आठवीचे 13 विद्यार्थी उतिर्ण झाले.सर्व यश्यस्वी विद्यार्थ्यांचे माजी उपशिक्षणाधिकारी व संस्थेचे मार्गदर्शक एस.टी.नलावडे,धनवटे,पाचकवडे,तांबे यांनी गुलाबपुष्पे देऊन अभिनंदन केले.