उस्मानाबाद :- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सामाजिक,आर्थिक उंची वाढविण्यासाठी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या शेतकऱ्यांसाठीच्या कार्याबद्दल त्यांना डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आलेली आहे. 

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे-पाटील यांनी शेतकरी म्हणून शेतकऱ्यांकरिता केलेल्या भरीव कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून सन 2014 पासून साजरा करण्यात येत आहे. याही वर्षी नारळी पोर्णिमेच्या दिवशी म्हणजेच दि. 25 ऑगस्ट 2018 रोजी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जन्मदिवस राज्यात शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी दिन साजरा करताना जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा) व कृषि विकास अधिकारी यांच्या  तसेच तालुका स्तरावर संबंधित तालुका कृषि अधिकारी, गट विकास अधिकारी, यांच्या समन्वयाने शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना/अभियान/उपक्रम इ.ची माहिती आणि लाभ घेण्याच्या कार्यपद्धती याबाबत तांत्रिक मार्गदर्शन व सहाय्य देण्याबाबतच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.तरी सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा,असे कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात आले आहे.

 
Top