काटी :-  तुळजापूर  तालुक्यातील काटी गावाशेजारील नरसिंह  तांडा येथे हरणाचे (काळविटाचे) पिल्लू हरणाच्या कळपातून भरकटून ते  येथील  शेतकरी  जिवाजी हिरामन चव्हाण  यांच्या  शेळीच्या  कळपात शिरले. शेळी पालक शेतकरी  जिवाजी हिरामन चव्हाण  यांच्या  समयसूचकतेमुळे  त्यांनी तात्काळ  वनपरिमंडळ तुळजापूर  यांना संपर्क करुन माहिती दिली. शनिवार दि.(11) रोजी वनपरिमंडळ  अधिकारी  व्ही.एस. पाटील यांनी तात्काळ शेतकऱ्याची भेट घेऊन  काळविटाचे  लहान पिल्लू  ताब्यात  घेतले. व  ते पिल्लू रविवारी दुपारी  येडशी येथील  अभयारण्यात  सोडले असल्याचे  वनपाल आर. एन. शिंदे,  वनरक्षक  व्ही. एस. पाटील  यांनी सांगितले. 
    जागृत शेतकरी जिवाजी चव्हाण यांच्या समय सूचकतेमुळे काळविटाचे लहान  पिल्लू वनविभागाकडे  सोपविल्याने चव्हाण  यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

 
Top