नळदुर्ग :- बोगस प्रस्ताव सादर करुन शासनाची फसवणूक करणा-या माकणी ता. लोहारा येथील एका बिअरबारचा परवाना रद्द करण्याची मागणी नळदुर्ग येथील आरटीआय कार्यकर्ते अजीज सय्यद यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे दि. 14 ऑगस्ट रोजी निवेनाद्वारे केली आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, दि. 30 जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्य कार्यालय उस्मानाबाद येथे मौजे माकणी ता. लोहारा येथील एका बिअरबारची माहिती मागितली असता त्यावरुन संबंधित हॉटेल व बिअरबार परवान्यासाठी देण्यात आलेल्या प्रस्तावावर बनावट सही, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरही वेगळी सही, त्याचबरोबर तहसिल कार्यालयाकडून काढलेली सॉलन्सी न्यायालयाच्या कामासाठी असे नमूद केले आहे. त्याचबरेाबर एकच घर नंबर एकाच तारखेला दोन व्यक्तीच्या नावे करुन ग्रामपंचायत कार्यालयातील ठराव, प्रमाणपत्र परवानगी आकारणी हे सर्व कागदपत्र ग्रामपंचायतीतील ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत करुन फसवणूक केल्याचा आरोप सय्यद यांनी करुन निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित सरपंच हे आपल्या पदाचा दुरुपयोग करुन शासनाची फसवणूक करत असल्याचे म्हटले आहे. कागदपत्रात दाखवण्यात आलेल्या ग्रामपंचायत येथील सर्व प्रमाणपत्रामधील गट नंबर व सर्व्हे नंबर मौजे करजगाव ता. लोहारा येथील नमूद आहे. त्याची नोंद माकणी ग्रामपंचायत कार्यालयात नोंद घेतली असल्याचे अजिज सय्यद यांनी म्हटले आहे. संबंधित सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह शासनाची फसवणूक करणा-यावर कडक कारवाई करुन संबंधित बिअरबारचा परवाना रद्द करण्याची मागणी अजिज सय्यद यांनी केली आहे. या निवेदनाची एक प्रत राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक उस्मानाबाद यांना पाठवण्यात आली आहे.

 
Top