नळदुर्ग :- वागदरी ता. तुळजापूर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील बि .अार .ग्रुपच्यावतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९८ व्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील युवा नेते अमोल पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईचे तालुका सचिव चंद्रकांत दुपारगुडे, माजी उपसरपंच बालाजी बिराजदार ,ग्रामपंचायत सदस्य महादेव बिराजदार ,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार आदी उपस्थित होते .
यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना अमोल पाटील म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवी जीवनाचे वास्तविक चित्र रेखाटणारे आहे तर आरपीआयचे जिल्हा प्रमुख सल्लागार एस के गायकवाड म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून गोरगरीब कष्टकरी कामगारांच्या व्यथा आणि वेदना जगाच्या वेशीवर मांडले, प्रारंभी माजी उपसरपंच कविता गायकवाड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. युवा कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांची अखिल भारतीय गुरव समाज मंडळाच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बी आर तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाईचे एस.के गायकवाड यांनी केले. यावेळी सुरेश महाराज ,ग्रापं सदस्य मुक्ताबाई वाघमारे ,रमाई महिला बचत गटाच्या उज्वला वाघमारे, गीता झेंडारे, कमल धाडवे बी आर ग्रुपचे काशीनाथ वाघमारे ,लक्ष्मण वाघमारे, धीरज गायकवाड ,बाळू कांबळे, पिंटू भंडारे ,आकाश झेंडारे ,अजय मुकदान ,सुर्यकांत वाघमारे, शिवाजी वाघमारे सह उपस्थित होते