बार्शी (गणेश गोडसे) :-
गत तिस वर्षापासुन अविरतपणे सुरू असलेली बार्शी-तांबेवाडी ही मुक्कामी असलेली एस. टी. बस पुर्ववत सुरू करण्याची मागणी तांबेवाडी व परिसरातील पाच गवांमधील नागरिकांनी वारंवार करूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बार्शी आगाराकडुण त्या मागणीला कसलाच प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मांडेगाव व बेलगाव या दोन ग्रामपंचायतींनी येत्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी बार्शी आगाराच्या प्रवेशद्वारासमोर उपोषणास बसण्याचा ईशारा एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
बार्शी ते तांबेवाडी ही बस बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावरील जनतेच्या समस्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही बस सुरु झाल्यास पाच गावांमधील शालेय विद्यार्थ्यांसह व्यापा-यांची सोय होणार आहे. ताडसौंदणे, बेलगाव, मांडेगाव, देवळाली व तांबेवाडी या भागातील अनेक विद्यार्थी ,बार्शी येथील शाळा व महाविद्यालयात, शिकण्यासाठी ये-जा करत असतात.मध्यंतरी हा रस्ता खराब असल्याने बार्शी आगाराची ही बस बार्शी आगार व्यवस्थापकांनी बंद केली होती.सध्या या मार्गावरील रस्ता चांगल्या पद्धतीने करण्यात आला आहे. मात्र तरीही एसटी महामंडळाच्या बार्शी आगाराने बस पुर्ववत सुरू केलेली नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. महामंडळाने या मागणीचा विचार करुन बस पुन्हा सुरु करूण गैरसोय दुर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.परिवहण महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे कि ही बस सेवा 25 वर्षापासून सुरू होती.बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे या मार्गावरील ज्येष्ठ नागरिक, नौकरदार,विद्यार्थी वर्ग यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापुर्वी वारंवार लेखी निवेदन व पत्रे देऊनही त्या पत्राला केराची टोपली दाखवली जात आहे. तरी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष केंद्रित करून तातडीने बस सेवा पुर्ववत सुरू करावी अन्यथा 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी ग्रामस्थांसह उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती आगार व्यवस्थापक, बार्शी यांच्या सह संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत.