बार्शी (गणेश गोडसे) :
   पेरणीनंतर गायप झालेल्या वरूणराजामुळे बार्शी तालुक्यातील बहुतांश गावातील खरीप पिके संकटात सापडली असुन अणेक गावात तर सोयाबीनची पिके वाळुन गेल्यामुळे त्याचा पाला पाचोळा उडुण जात आहे. नगदी पिक म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या सोयाबीनच्या पिकानेच पुन्हा एकदा मोठा फटका दिल्यामुळे शेतकरी पुरता भयभीत झाल्याचे चित्र एकंदरीत बार्शी तालुक्यात निदर्शनास येत आहे.
    नांगरणी,कोळपणी, बि -बियिने,पेरणी,कोळपणी,फवारणी आदी सर्व सोपास्कर पार पाडल्यानतर निसर्गाने शेतकरी बांधवांची परिक्षा घेण्याचे ठरवुन वरूणराजा लुप्त झाला आहे.उजाडणारा दिवस तरी पाऊस घेऊन येईल ही भोळी भाबडी आशा धरून शेतकरी येणारा दिवस ढकलताना दिसत आहे.मोठ्या आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर असलेल्या बार्शी तालुक्यातील बळीराजाला शासन प्रशासनाने मानसिक व आर्थिक मदतीचे बळ देण्याची गरज निर्माण झाली आहे. योग्य वेळी आधार दिला तरच शेतकरी सावरला जाईल अन्यथा याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. जसजसा दिवस पुढे पुढे ढकलत आहे तस तसा शेतक-यांच्या मनात धसका बसत  आहे. सध्याच्या उभ्या पिकांना जिवदान देण्यासाठी पावसाची मोठी गरज निर्माण झाली आहे.बळीराजानेही मोठा खेळ खेळुन आपल्याला पिक विम्याच्या माध्यमातून आलेला सर्व पैसा पेरणीसाठी लावला होता. बार्शी तालुक्यात अणेक गावात वरूणराजाने पेरणीयोग्य हजेरीच न लावल्यामुळे ब-याच शेतक-यांनी पेरणीच केलेली नाही.मात्र ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या घरातील किडुक मिडुक विक्री करून उसणवार, सावकारी देणे करूण पिकांची पेरणी केली आहे अशा शेतक-यांसमोर काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. 
नजरा विमा कंपण्याकडे:- शेतकरी खरीप पिकांची पेरणी करून काळ्या आईची ओटी भरून नामानिराळे झाले. मात्र पेरणीनंतर निसर्गाने मानवाप्रमाणेच आपला मनमानी कारभार दाखवण्यात कोणतीच कमतरता ठेवली नसुन चक्क पावसाळ्यात पाऊस दाखवा व बक्षिसे मिळवा अशी घोषणा जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पिकांचा पाला पाचोळा झाल्यामुळे व पिके वाळुन गेल्यामुळे विमा कंपण्यांनी शेतकरी बांधवांकडुण मोठ्या खुबीने भरून घेतलेल्या पिक विम्याच्या रकमेपोटी आता पिकांची नुकसान भरपाई मंजुर करून शेतकरी बांधवांना आधार देणे आवश्यक ठरणार आहे.
     पिक विम्याचे पोटी विमा कंपण्यांनी शेतकरी बांधवांकडुण कोट्यावधी रूपयांची रक्कम वसुल केली असुन  आता विमा कंपण्यांनीही आपला प्रामाणिकपणा दाखवुन खरीप पिकांचा विमा मंजुर करावा अशी मागणी शेतकरी बांधवांमधुन होत आहे. गणेशोत्सव कांही दिवसांवर आला असुन किमान आगामी काळात तरी वरूणराजा बरसेल,नद्या नाले भरूण वहातील, विहीरी पाण्याने तुडुंब भरतील अशी भाबडी आशा धरून शेतकरी दिवस काढताना दिसत आहे.ऑनलाईन अर्ज दाखल करताना शेतकरी बांधवांना ऑनलाईन केंद्राचे दरवाजे अनेकदा झिजवावे लागले आहेत. शासनाने करपुन गेलेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी तालुक्यात वाढत आहे. शेतकरी व विविध संघटना नुकसान भरपाई मिळावी यासाठी अर्ज, निवेदने तहसिल कार्यालयात सादर करत आहेत. शासनाने शेतक-यांच्या मागणीचा प्राधान्यक्रमने विचार करणे गरजेचे आहे. 
     हवामान खात्याच्या हवा खाणा-या खात्याने हवेतल्या बोगस बातम्या दिल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राज्यात लवकरच मान्सुन धो धो बरसणार, लवकरच राज्यभर धुवाॅधार सुरू होणार अशा बातम्या ऐकुण व वृत्तपत्रामध्ये वाचुण शेतक-यांचे कान विटण्याची वेळ आली आहे. मात्र तरीही वरूणराजाचे आगमण कांही केल्या होत नाही.गतवर्षीच्या शिल्लक पाणीसाठ्यावर कामकाज सुरू असले तरी पाऊस न आल्यास पुढील वर्षी पाळीव,दुभती जनावरे जगवायची कशी,जगायचे कसे, कर्जे फेडायची कशी आदी प्रश्न सर्वसामान्य जनतेसह शेतक-यांसमोर आ वासुन उभे राहु शकतात.गत चार वर्षांच्या तुलनेत या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस बरसेल असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतानाच पुन्हा वरूणराजा शेतक-यांना प्रतिक्षेत ठेवत असल्याने शेतक-यांच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.आकाशात ढग जमा होत असले तरी पाऊस पडत नसल्याने वरूणराजा अजुन किती दिवस परिक्षा पहाणार आहे.
 
Top