मुरुम, दि.१३ : येथील भीमनगर येथे राहणाऱ्या श्री आण्णाराव कांबळे यांच्या घरीच शनिवारी (ता.११) रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून कांबळे परिवारातील कुमारी अदिती,अस्मिता,कुमार हर्षल व विशाल या चौघांनी मिळून जसे जमतील तसे थोडे-थोडे पैसे टाकून उन्हाळी शुट्टीमध्ये मुंबई दर्शन करण्यासाठी त्यांनी पिग्गी बँक मध्ये ३७२५ रुपये जमा केले होते.ही पिग्गी फोडून सध्या निर्माण झालेल्या कोरोना संकटामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे.या उद्येशाने या चिमुल्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे कांबळे कुटूंबियांनी देखील यामध्ये ५००० रुपयाची रक्कम घालून अशी एकूण ८७२५ रुपयाची रक्कम ऑनलाईनने याच दिवशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली.
महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी १७ व्या शतकात पुण्यामध्ये असीच प्लेगची साथ सुरु झाली होती.यावेळी येथील मुलांना उपचारासाठी सावित्रीबाई फुले दवाखान्यात घेऊन गेल्या या दरम्यानच त्यांना देखील प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.या घटनेची आठवण व जाणीव या चिमुरड्यांना झाल्यानेच त्यांनीही मदतीचा हात पुढे करु सामाजिक बांधिलकी काय असते याची समाजालाही अठवण करून दिली आहे.यावेळी या चौघांनी फुले दांप्त्याबद्लचे विचार मांडून परिवाराचे लक्ष वेधले.त्या काळच्या घटनाक्रमाचा इतिहासही त्यांच्या वाणीतून मांडला.या प्रसंगी म.फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वैशाली व रेश्मा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन घरातच अभिवादन करुन जयंती साजरी केली.प्रा.आण्णाराव कांबळे व प्रा.नानाराव कांबळे या दोघांनीही दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वर्गणी देतात.यंदा कोरोना संसर्गामुळे जयंती साध्या पध्दतीने व घरीच करावयाची असल्याने त्या वर्गणीतील दयावयाची रक्कम त्यांनी आपल्या मुलांनी घेतलेल्या निर्णयाला साथ देत ५००० रुपयाची मदत केली.चिमुरड्यांनी जो एक संकल्प केला यामुळे कांबळे परिवारांने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.खऱ्या अर्थाने आपण महापुरुषांचा वसा आणि वारसा चालवत असल्याने या भूमिकेचे व चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.