तुळजापूर, दि. १३ : तुळजापूर तालुक्यातील रामतीर्थ, रामनगर, गायरान तांडा, येडोळा, जखणी तांडा येथे एसबीआय फाउंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत वरील पाच गावातील अत्यावश्यक  सेवेत सक्रिय असणाऱ्या व बाहेर पडणा-यांना व या अंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र मधील कर्मचारी, बँक कर्मचारी, पोलीस कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, दूध वाटप करणारे, किराणा दुकानदार, राशन दुकानदार, अशा गरजूंना जवळजवळ 300 मास्क चे वाटप करण्यात आले.
    
  यावेळी दिलासाचे विलास राठोड, गुरुदेव राठोड, भूषण पवार, अजित राठोड, बाळू चव्हाण, मनोज चव्हाण,  रामतीर्थ गावचे सरपंच बालाजी राठोड, उपसरपंच सुनील चव्हाण, सर्व सदस्य, येडोळा गावचे सरपंच पद्माकर पाटील, उपसरपंच राजेंद्र जाधव, सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.
 
Top