नळदुर्ग, दि. 12 : महामानव ,विश्वरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन रिपाइं (आठवले) च्या वतीने करण्यात येत आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांने व भव्य मिरवणूक काढून साजरी करतो. परंतु यावर्षी संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून संचार बंदी लागु करून देशभर लाँकडाऊन जाहीर केले आहे. तेंव्हा बाबासाहेबांचे आनुयायी म्हणून घेत असताना कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरून गर्दी करून जयंती साजरी न करता घरीच प्रतिमा पुजन व बुध्द वंदना , विद्यार्थ्यांनी किमान आठ तास अभ्यास करून, जेष्ठानी विविध ग्रंथाचे वाचन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असे आवाहन रिपाइंचे आनंद पांडागळे,जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष दुर्वास बनसोडे, तुळजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा युवा कार्याध्यक्ष अरुण लोखंडे ,तुळजापूर शहराध्यक्ष अरुण कदम, नळदुर्ग शहराध्यक्ष दत्ता बनसोडे, कार्याध्यक्ष महादेव कांबळे ,नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे यानी केले आहे.