जळकोट, दि.१३ (मेघराज किलजे) :

 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कोविड-१९ स्टेट टास्क फोर्सची    व्हिडीओ कॉन्सफरींग  द्वारे दुसरी बैठक आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष  बसवराज पाटील बोलताना म्हणाले की ,कोरोना नंतरचे महाराष्ट्रावरील अर्थकारणाचे संकट फार मोठे असणार आहे.आज राज्यामध्ये किती हजार कोटीचे नुकसान होत आहे. सद्या राज्यसरकार कडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कीती कर्ज घ्यावे लागेल. आपल्या अर्थसंकल्पावर किती टक्के कर्ज घेणे आवश्यक आहे. आणि याचा आंतरराष्ट्रीय बाजार पेठेवर काय परिणाम होते याचा ही विचार करावा लागेल.या कोरोनाच्या लढाईत सर्वांनी मिळुन काम केले पाहीजे. असे बसवराज पाटील म्हणाले.

तसेच पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोरोना संदर्भात प्रत्येक प्रत्येक जिल्हास्तरावर हेल्पलाईन चालु करण्याचे नियोजन आहे.कोरोना संदर्भात काही अडीअडचणी आल्यास या हेल्पलाईनचा उपयोग होईल.
 
Top