तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
देशासह राज्यामध्ये कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असुन तामलवाडी शेजारील सोलापुर शहरामध्ये कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने कोरोना आता उंबरठ्यावर आला असुन प्रत्येक नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे.
जगभरात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने लाखो लोकांना मृत्युने कवाटळले असुन लाखो लोकांना याच्या विळखायात सापडले आहेत.भारत देशासह राज्यामध्येही कोरोनाचा संसर्ग वाढल्याने हजारो लोकांना लागण झाली आहे तसेच शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत.या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देशासह राज्यामध्ये लाॅकडाऊन पुकारण्यात आला आहे.काही जिल्ह्यामध्ये तेथील प्रशासनाने कडक पावले उचलले असुन जनता लाॅकडाऊनचे पालन करीत असल्याने त्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन ते जिल्हे ग्रीन झोनमध्ये गेले आहेत.
उस्मानाबाद जिल्हाच्या सिमेवर असलेल्या तामलवाडी येथुन २० की.मी. अंतरावर असलेल्या सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.तामलवाडी व परीसरितील जनतेचा सोलापुरशी जवळचा संबंध असल्याने पोलिस प्रशासनाच्या वतीने सिमेवर कडक नाकाबंदी केली आहे.तामलवाडी व परीसरितील नागरीकानी पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून घरातच थांबावे, विनाकारण घराबाहेर पडु नये,मास्कचा वापर करावा अशा सुचना वारंवार देऊनही काहीजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत.
कोरोनाला गांभीर्याने घ्या आपल्यासह आपले कुटुंबाचा तरी विचार करा.चीनवरून कोरोना सोलापुरला येऊ शकतो तर तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही का? कोरोना उंबरठ्यावर आला आहे नागरीकांनो आता सतर्क रहा, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा,सोलापूर,पुणे,मुंबई व इतर बाहेरून येणार्या नागरीकांची माहिती पोलिसांना कळवा व स्वतः सावधानता बाळगुन घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन तामलवाडी व परीसरातील नागरिकांना शिवरत्न बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान तामलवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.