मुरूम : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बुधवार (ता.२२) रोजी बैठक पार पडल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे होते.या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी ग्रामविकासमंञी बसवराज पाटील, ऊर्जा मंत्री नितीन राऊत,महाराष्ट्र कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार राजीव सातव,खासदार कुमार केतकर,खासदार बाळू धानोरकर,माजी मंत्री नसीम खान,मंत्री वर्षा गायकवाड व मंत्रीमंडळातील काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री आदींनी 

यावेळी चर्चेत व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे  सहभाग घेतला.सर्वानुमते खालील निवेदनावर चर्चा करून ते प्रसिद्ध करण्याचे सर्वानुमते ठरले.पालघरमध्ये घडलेल्या दोन साधूंसह तीन जणांच्या निर्घृण हत्येचा आम्ही निषेध करत आहोत.हे अत्यंत दुख:द आणि अमानवीय कृत्य आहे.मात्र सदर घटनेत कोणताही धार्मिक विद्वेषाचा दृष्टीकोन नाही,असे असतांनाही काही माध्यमे व राजकीय व्यक्ती या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत.हे अत्यंत गंभीर असल्याची चर्चा यावेळी करण्यात  आली.कोरोना संकटाच्या काळात महाराष्ट्रासह देशाचे सामाजिक वातावरण बिघडविण्याचा हा अत्यंत निंदनीय प्रकार असून समाजात जातीय आणि धार्मिक विद्वेषाची भावना पसरविण्यासाठी काही माध्यमे जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामी याने अशाच पद्धतीने सामाजिक विद्वेष पसरविणाऱ्या टिप्पणी करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.या सोबतच काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संदर्भातही अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर घृणास्पद टिप्पणी केली जात आहे.आम्ही सर्वजण याचा जाहीर निषेध करीत आहोत.या प्रकाराला पत्रकारिता म्हणता येणार नाही.बंधुभावाचा संदेश देणाऱ्या आपल्या देशात सामाजिक विद्वेष पसरविणे कदापि मान्य होणार नाही.देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी ते घातक असून त्यामुळे सामाजिक वातावरण कलुषित करणाऱ्या अर्णब गोस्वामी व त्यांच्या रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्याची विनंती आम्ही संयुक्तरीत्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करणार असल्याची चर्चा या व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आल्याची माहिती बसवराज पाटील यांनी दिली.         

  
 
Top