नळदुर्ग : शासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत कोरोनाव्हायरस च्या प्रादुर्भावापासुन बचाव करण्याकरिता नळदुर्ग शहरातील शेख कुटुंबीयांनी आपल्या मुलाचा विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडल्याने शेख व पठाण कुटुंबानी घेतलेल्या निर्णयाचा सर्वत्र स्वागत केले जात आहे.
नळदुर्ग येथील कचरू चांदसाब शेख यांचे चिरंजीव अब्दुल कलाम आणि बारूळ तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथील कै. मदार चांदसाब पठाण यांची कन्या गोरीमा यांचा विवाह रविवार 19 एप्रिल रोजी नळदुर्ग येथे करण्याचा ठरला होता. संपूर्ण जगामध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने भारतात देखील विशेष करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलत लाॅकडाऊनचे पालन करीत सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा लग्नसोहळा कसे पार पडणार याची चिंता वधू व वरा कडील परिवाराला होती.
यावेळी आलेम मोहम्मद रजा, हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार, पत्रकार लतीफ मामा शेख व सय्यद शहाहुसेन इनामदार व नुरानी ग्रुपच्या सदस्यांनी वधू व वरा कडील मंडळीशी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीविषयी तसेच इस्लाम धर्मात साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्यासंदर्भात दिलेली शिकवण संदर्भात चर्चा करून यावेळी वधू कडून नबीलाल शेख व मगबुल उस्ताद तर वराकडून खालेद इनामदार व कचुर शेख हे या लग्नात सहभागी झाले व हा लग्न रहीम नगर येथील नुरानी मस्जिद येथे वरील लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित वरील मान्यवरांनी सोशल डिस्टन्सिंग व मास्क चा वापर करून प्रशासनाने केलेल्या सूचनेचा पालन करीत विवाह सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थित पार पाडुन समाजासमोर एक आदर्श ठेवल्याबद्दल शेख व पठाण कुटुंबाचे कौतुक केले जात आहे.